पुरंदरला गुंजवणीचे पाणी आघाडी सरकारच देणार : अजित पवार

पुरंदरला गुंजवणीचे पाणी आघाडी सरकारच देणार : अजित पवार

गराडे ः पुरंदरच्या विकासासाठी पुरंदर व जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना व्यवस्थित चालविण्यासाठी प्राधान्यक्रम असेल. तसेच गुंजवणीचे पाणी हे आघाडी सरकारच आणणार आहे. यात पवारसाहेब, मी, सुप्रिया सुळे व संजय जगताप यांचा मोठा सहभाग असेल, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सासवड (ता. पुरंदर) येथील पालखी तळावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार संजय चंदुकाका जगताप यांच्या प्रचारार्थ आज (ता. 19) सांगता सभेत अजित पवार बोलत होते. या वेळी सोनोरी येथील माजी सरपंच सतीश शिंदे यांच्यासह अनेकांनी पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

अजित पवार म्हणाले, ""पुरंदर-हवेलीचा विकास करण्याची धमक फक्त संजय जगताप यांच्यातच आहे. शिवतारे यांना निवडणूक आल्यावरच गुंजवणीचे पाणी आठवते. मात्र हे पाणी आणण्याची त्यांच्यात धमक आणि ताकद नाही. पुरंदरच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी संधी द्या, असे आवाहन संजय जगताप यांनी केले.

पावसामुळे पोहोचू शकलो नाही : शरद पवार

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना आम्ही सर्वांनी एक विचाराने उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे संजय जगताप यांना निवडून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी मोबाईलद्वारे केले. पावसामुळे कार्यक्रम स्थळी पोहोचू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com