मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला पाच जिल्ह्यांत प्रवेशबंदी?

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला पाच जिल्ह्यांत प्रवेशबंदी?

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाजनादेश यात्रेला पाच जिल्ह्यांत प्रवेशबंदी होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांची यात्रा रोखली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दीड ते दोन महिन्यांत आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 1 ते 31 ऑगस्टपर्यंत महाजनादेश यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहे. या यात्रेची सुरवात अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातून होणार आहे. 

या यात्रेत मुख्यमंत्र्यांकडून राज्य सरकारने केलेल्या कामासोबत नवीन काही घोषणा करण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर, नंदुरबार, अकोला, वाशीम व धुळे जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्‍ती करून महिनाभरात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या पाच जिल्ह्यांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्‍यता आहे. पाच जिल्ह्यांत निवडणुका असल्या तरी याचा परिणाम राज्यावर होईल. सरकारला धोरणात्मक निर्णय घेताना अवघड जाणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला फटका बसणार आहे.

आचारसंहितेच्या काळातच ही यात्रा निघेल. यात्रा काढताना राज्य निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे मत प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काहींकडून यात्रेलाच आयोगाकडून मंजुरी मिळणार नसल्याचे सांगण्यात येते. आयोग याबाबत काय निर्णय घेईल, हा नंतरचा भाग असला तरी मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला या पाच जिल्ह्यांत प्रवेश मिळणार नसल्याची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com