मेंढ्यांच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्याला दिली : राजू शेट्टींवर मुख्यमंत्र्यांची टीका

राजू शेट्टी यांनी पवार साहेबांना शिव्या दिल्या आणि त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या. आता माझा राजू शेट्टी याना सवाल आहे की आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात हाच आहे का तुमचा स्वाभीमान. मेंढ्यांच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्याला दिली असे राजू शेट्टी यांच्याबद्दल म्हणता येईल," अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. सांगली मध्ये संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
मेंढ्यांच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्याला दिली : राजू शेट्टींवर मुख्यमंत्र्यांची टीका

सांगली : राजू शेट्टी यांनी पवार साहेबांना शिव्या दिल्या आणि त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या. आता माझा राजू शेट्टी याना सवाल आहे की आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात हाच आहे का तुमचा स्वाभीमान. मेंढ्यांच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्याला दिली असे राजू शेट्टी यांच्याबद्दल म्हणता येईल," अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. सांगली मध्ये संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, "सांगली जिल्ह्याने काँग्रेसला आशीर्वाद दिला. काय तिथे काँग्रेसची काय अवस्था आहे. सांगलीच्या जनतेने आमचे ऐकले आणि सांगली काँग्रेस मुक्त केले. सांगलीत काँग्रेस तिकीट कोण घेत नव्हते. प्रत्येकाने आपआपली जिरवा जिरवा केली आहे. स्वाभिमानीने ज्याला तिकीट दिले त्यांनी कारखाने विकून खाल्ले आहेत. थोडक्यात मेंढ्यांच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्याला दिली असे म्हणता येईल." 

फडणवीस पुढे म्हणाले, "ही आघाडी नाही महा खिचडी आहे. यांनी ५५ वर्षे यांनी राज्य केले. भ्रष्टाचार घोटाळे केले. या महाखिचडीच्या नेत्यांची भाषणे पहा त्यात ते मोदींचे नाव घेतात. ते म्हणे गरिबांना ७२ हजार देणार आहेत. कुठून देणार कोणाला देणार आहेत? आयजी च्या जीवावर बायजी उदार, अशी यांची स्थिती आहे. आता देशाला तुमची गरज नाही. मोदी आहेत. काँग्रेसची ७२ हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा आहे. राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे मनोरंजन आहे. यावर कोण्ही विश्वास ठेवू नका."

"काही लोक देशाला खिळखेले करण्याचे काम करत आहेत. आमच्या देशात ताकत आहे. पण राजकीय लोक लष्कराला परवानगी देत नव्हते आणि बॉम्ब पडत होते. पण मोदी हे घुसून कारवाई करतात. पाकिस्तान हा कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे. आम्ही पाकिस्तानमध्ये हल्ला केला याचे पुरावे काय आहेत असे विरोधक म्हणतात. आम्हाला जर आधी माहीत असते तर यांच्या नेत्याला राॅकेटबरोबर सोडले असते. आताचे सरकार हे चर्चा करणारे सरकार नाही, तर ठोकणारे सरकार आहे, हे पवार साहेबांना जाऊन सांगा," अशीही टीका फडणवीस यांनी केली. 

राजू शेट्टी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com