मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे दोघेही दादर येथील बालमोहन विद्यामंदिराचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचा गौरव करण्यासाठी सोमवारी (ता. 10) अभिमान सोहळा होणार आहे.
बालमोहन विद्यामंदिरातून 1976 मध्ये उद्धव ठाकरे आणि 1977 मध्ये जयंत पाटील दहावी उत्तीर्ण झाले. शाळेचे दोन माजी विद्यार्थी राज्यात मंत्री असण्याचा हा दुर्मिळ योग आहे.
त्यानिमित्त शाळासोबत्यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी 12 वाजता ठाकरे आणि पाटील यांचा सत्कार केला जाणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे वर्गबंधू नाट्य दिग्दर्शक अजित भुरे या सोहळ्याचे सूत्रसंचालन करतील. या वेळी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री विद्यार्थिदशेतील आठवणींना उजाळा देणार आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांना सीएए आणि एनआरसी संदर्भात मार्गदर्शन केले. सीएए आणि एनआरसी म्हणजे नेमकं काय आहे हे समजवून सांगितलं. या वेळी बोलताना उद्धव म्हणाले की काही लोकं म्हणतायत शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅग्रेससोबत गेल्यानं आम्ही हिंदुत्व सोडलंय. पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही. मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही. एक माणूस एक झेंडा आहे. जगाला ठाऊक आहे आपलं हिंदुत्व काय आहे, अशा शब्दांत त्यांनी भूमिका मांडली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.