उद्धव ठाकरेंचा भरोसा अनिल परबांवर : काॅंग्रेसला समजविण्याची जबाबदारी

....
anil parab
anil parab

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात (सीएए) संबंधात विधानसभेत मांडल्या जावयाच्या  ठरावाला कॅबिनेट बैठकीत कॉंग्रेसने आक्षेप घेतल्याचे समजते. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस याबाबत सौम्य असले तरी कॉंग्रेसने केलेल्या विरोधामुळे पूर्वघोषणेनुसार आज समिती नेमण्याचा तोडगा मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुचवला.

 सीएए,एनपीआर या मुददयांवरून जनतेमध्ये असंमजसाची भावना आहे. राज्‍य सरकारने याबाबत काय भूमिका घ्‍यायची यासाठी सहा मंत्र्यांची समिती नेमण्यात आली आहे.परिवहन तथा संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली असल्‍याची घोषणा मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी विधानसभेत केली.

सीएए,एनपीआर या मुद्द्यांवरून अल्‍पसंख्यांक समाजाने देशपातळीवर आंदोलने केली आहेत. मुंबई व महाराष्‍ट्रातही त्‍याचे पडसाद उमटले. महाराष्‍ट्रातील एकाही नागरिकाच्या अधिकारावर यामुळे गदा येणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आधीच दिले आहे. याबाबत अभ्‍यास करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या ज्‍येष्‍ठ सदस्‍यांची एक समिती स्‍थापन करण्यात येईल अशी घोषणा त्‍यांनी आधीच केली होती. त्‍यानुसार ही समिती स्‍थापन करण्यात आली आहे. या समितीत जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, सुनील केदार, उदय सामंत, विजय वड्डेटीवार हे सदस्य आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com