मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला आणि .....

..
Mahatma-Fule-Statue
Mahatma-Fule-Statue

औरंगाबाद : शहरातील औरंगपुरा भागात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याचे काम गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित होते. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक फोन केला व तातडीने फुले दांपत्याचा पुतळ्याची फाइल जागची हलली असे राज्यमंत्री अतुल सावे यांनी मंगळवारी पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सांगितले.

शहरातील मध्यभागी असलेल्या औरंगपुऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा होता. पण स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांना देखील त्यांच्या शेजारी स्थान देण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत होती. अखेर ही मागणी पुर्ण होऊन आज फुले दांपत्यांच्या पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री अतुल सावे यांनी या पुतळ्याच्या उभारणीचा प्रवास आपल्या भाषणात उलगडून सांगितला. सावे म्हणाले, फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची मागणी 2000 पासून सुरू होती. त्यासाठी वारंवार आंदोलने करावी लागली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधामुळे आता मुख्य रस्त्यावर पुतळे उभारणे सोपे राहिले नाही. अनेक वर्षे ही फाइल जिल्हाधिकाऱ्यांकडे पडून होती. याठिकाणी महात्मा फुलेंचा जुना पुतळा होता.

फक्त नूतनीकरण गृहीत धरून फाइल निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. त्यामुळे आज पुतळ्याचे अनावरण होऊ शकले असे त्यांनी स्पष्ट केले. 

फुले दांपत्याचा एकत्र पुतळा असलेले औरंगाबाद हे एकमेव शहर असल्याचा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी याप्रसंगी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com