मुख्यमंत्री वामनाचा अवतार : स्वाभिमानीचा हल्लाबोल 

.
swabhimani
swabhimani

सोलापूर : महाराष्ट्राने आजवर अनेक मुख्यमंत्री पाहिले आहेत. परंतु चळवळीतील कार्यकर्त्यांना डांबून ठेवणारे आणि त्यांची मुस्कटदाबी करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री असल्याचा आरोप करत फडणवीस हे वामनाचा अवतार आहेत. दुष्काळात पिचलेल्या बळिराजाच्या डोक्‍यावर पाय ठेवत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी केला आहे. 

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, जिल्हा संघटक विजय रणदिवे, गजान बंगाळे पाटील आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रा काढत आहेत. ही यात्रा ज्या भागात जात आहे त्या भागातील चळवळतील कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्याचे काम राज्यातील प्रशासकीय यंत्रणा करत आहे. जालन्यामध्ये पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या समोरच माझ्यासह इतर कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली.  त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप केला नसल्याचेही मोरे यांनी सांगितले. 

दुष्काळाने राज्य होरपळत असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत नाही. चळवळीतील कार्यकर्त्यांची धरपकड आणि शेतकऱ्यांच्या व्यथा राज्य सरकारपुढे मांडण्याठी 16 सप्टेंबरला औरंगाबाद येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह भीम आर्मी, मराठा क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडीसह इतर संघटना व पक्षही सहभागी होणार आहेत. औरंगाबाद येथील क्रांती चौकातून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्या येणार असल्याचेही पूजा मोरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com