छत्रपती संभांजी राजे म्हणाले,मराठा आरक्षणात सरकार गंभीर चूक करत आहे 

"मराठा आरक्षणाची केस लढण्यासाठी पैशांची कमतरता असेल असे वाटत नाही. उलट सरकारने देशातील सर्वोत्तम वकिलांना भूमिका मांडायला सांगितले पाहिजे. - खासदार, छत्रपती संभाजी राजे
Sambhaji-Raje-Chchatrapati
Sambhaji-Raje-Chchatrapati

नाशिक :  मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यातील दोन्ही वकीलांना आज अचानक बदलले. ते महागडे असल्याचे कारण देण्यात आले आहे. ही एक गंभीर चूक सरकारकडून होत आहे, अशी नाराजी खासदार, छत्रपती संभाजी राजेंनी यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले असुन, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कल्पना देण्यात आली आहे काय? असा प्रश्‍न त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची अटीतटीची आणि अंतिम लढाई सुरु आहे. या संदर्भात सुनावणी होती. त्यासाठी भूमिका मांडणारे मुकुल रोहतगी आणि नाडकर्णी हे ज्येष्ठ वकील राज्य सरकारची बाजू मांडत होते. आज हा खटला दाखल करण्याची तारीख होती. त्यासंदर्भात नवनियुक्त सरकारी वकील राहूल कटनेश्‍वरकर यांनी त्यांना ब्रिफींग देखील केले होते.

मात्र काही वेळाने नवनियुक्त सरकारी वकील राहूल चिटणीस यांनी उपरोक्त वकिलांना न्यायालयात बाजू न मांडण्याची विनंती केली. त्याकरिता ते महागडे वकिल आहेत हे कारण देण्यात आले.

यासंदर्भात खासदार, छत्रपती संभाजी राजे यांनी नाराजी व्यक्त केली. ते महागडे आहेत हे पुरेसे कारणनाही. यापैकी श्री. रोहतगी माजी ऍटोर्नी जनरल आहेत. उच्च न्यायालयात देखील त्यांनी बाजू मांडली होती. त्यांच्या भूमिकेमुळे आरक्षण टिकण्यात मोठी मदत झाली. त्यामुळे सरकारकडे पुरेसे पैसे नाहीत असे वाटत नाही. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना याविषयी माहिती दिली आहे काय? असा प्रश्‍न त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com