सरसकट कर्जमाफीसाठी तातडीने पावले उचला - पृथ्वीराज चव्हाण

सरसकट कर्जमाफीसाठी तातडीने पावले उचला - पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर : लोकांची घरे, संसार पाण्यात गेले आहेत, त्यांना तातडीने मदत केली पाहिजे, तसेच शेती व जनावरेही पाण्यात गेली आहेत, सरकारकडे आम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी यापूर्वीच केली आहे. त्यादुष्टीने सरकारने आता सरसकट कर्जमाफीसाठी पावले उचलावीत. सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेला 60 दिवसाचा भत्ता व जनावरांसाठी दिवसाचे शंभर रुपये मदत यामध्ये वाढ करावी लागेल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

शाहू मार्केट यार्ड येथे शाहू सांस्कृतिक मंदिरात जाधवाडी, बापट कॅम्प, कदमवाडी या परिसरातील पूरग्रस्त स्थलांतरित झाले आहेत. त्या स्थळाला श्री चव्हाण यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. श्री चव्हाण म्हणाले की, "" मी कराडहून सकाळी निघालो, कोल्हापूरकडे येत असताना अजूनही वाटेत महामार्गावर व अन्य राज्य मार्गांवर पुराचे पाणी आहे, परिणामी वाहतूक ठप्प झाली आहे. सरकार मदत करीत आहे. त्यासाठी काही मंत्री दौरेही करत आहेत मात्र त्यामध्ये सुयोग्य नियोजन सुसंवाद दिसत नाही. अशा स्थितीत काही ठिकाणी मदत पोहचली, काही ठिकाणी मदत पोहचलेली नाही. अजूनही असंख्य लोक पुराच्या पाण्यात अडकून आहेत तर काही ठिकाणी लहान बाळे, आबालवृद्ध तात्पुरत्या निवाऱ्याच्या ठिकाणी आहेत.'' 

ते पुढे म्हणाले की,"" जनावरांच्या चाऱ्या पासून ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. लोकांचा जसा संसार वाहून गेला तसेच शेतीचेही नुकसान झाले. शेतातील पीक पुराच्या घशात गेली. उगवलेल्या पीकांचे नुकसान झाल्याने शेतकरी शेती संकटात आलेली आहे. त्यामुळे आमच्या सरकारने यापूर्वीच सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे अशी सरसकट कर्जमाफी देण्याबाबत सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.''. 

ते पुढे म्हणाले की, "" पूर ओसरताच तातडीने नुकसानीबाबतचे पंचनामे करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करावी लागेल. नुकसानभरपाई निश्‍चित करावी ती नुकसान भरपाई त्या-त्या पूरग्रस्तांपर्यंत पोहचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल याकडे सरकारने प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल.'' यावेळी त्यांच्यासोबत आमदार सतेज पाटील उपस्थित होते. 
मदत व पुनर्वसनमंत्र्यांची अक्षम्य चूक 
""पुराची परस्थिती गंभीर आहे, मदत व पुर्नवसन मंत्र्यांची अक्षम्य चूक आहे, ते आठ दिवस कुठे आहेत. सरकारी अधिकारी आपल्यावर काही चौकशी लागेल म्हणून जबाबदारी घेत नाहीत तेव्हा लोकप्रतिनिधीनींनी जबाबदारी घेऊन मदत पोचविण्यास पुढे आले पाहिजे. मात्र काही मंत्री आले, रोड शो, वॉटर शो करून गेले, कोणी वादग्रस्त विधान केले असेल, पण राजकारण सोडून लोकांपर्यंत मदत पोहचविण्यासाठी काम करावे लागेल.'' 

सरकार पूरग्रस्तांसाठी मदत करत आहे मात्र मदत समाधानकारक नाही. 2005 ला पूर आल्यानंतर आमच्या सरकारने भविष्यात पुराची समस्या व धोका टाळण्यासाठी विविध उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता, त्याचे संदर्भ या सरकारने कोठेही वापरलेले नाहीत. असे मत श्री. चव्हाण यांनी व्यक्त केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com