महाराष्ट्र लुटणाऱ्या 250 घराण्यांची आता कारवाईपासून सुटका नाही : चंद्रकांत पाटील

31 जुलैनंतर मुंबईत आणि कोल्हापूरातही आपण मोठे राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतपाटील यांनी जाहीर केले.
महाराष्ट्र लुटणाऱ्या 250 घराण्यांची आता कारवाईपासून सुटका नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यातल्या अडीचशे घराण्यांनी वर्षानुवर्षे महाराष्ट्र लुटला आहे.य घराण्यंना मागच्या पाच वर्षात आम्ही हात लावू शकलो नाही,कारण आम्हाला सरकार सुरळीत चालवायचे होते. आता येणारे सरकार हे मजबूत सरकार असणार आहे.त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांची सुटका आता कशी काय होणार,आता त्यांचे हिशोब चुकते करावेच लागणर आहेत,असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

सर्वसामान्यांच्या पैशाला यांनी हात लावला आहे. त्यामुळे यांची चौकशी होणारच, असे त्यांनी सांगितले. केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्याच्य पक्ष प्रवेश मेळाव्यात ते बोलत होते. आमदार अमल महाडीक,ग्रामीण अध्यक्ष हिंदुराव शेळके ,पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांच्य उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेउन भारतीय जनता पार्टी लोकांना भिती दाखवून भाजपात प्रवेश करुन घेत असल्याचा आरोप केला आहे. पण हे साफ चुकीेचे आहे. त्यांची माणसे त्यांना सांभाळता आली नाहीत. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार हे सहानुभूती मिळविण्यासाठी हा खोटा आरोप आहेत. मुळात इन्कम टॅक्‍स, ईडी,निवडणूक आयोग यांच्यावर कोणाचे राज्य नसते. पंधरा दिवसापुर्वी गमतीने मी भाजपात येता का?असे म्हणालो होतो.ते आले नाहीत म्हणून त्यांच्यावर छापे टाकले, हे म्हणने चुकीचे आहे. कारण अशा यंत्रणांना छापे टाकण्यासाठी दोन वर्षे मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे या छापा प्रकरणांशी आमचा कांहीही संबध नाही.

पाटील म्हणाले,``महाराष्ट्रावर गेल्या साठ वर्षात अडीचशे घराण्यांनी सत्ता गाजविली. या घराण्यांनी अक्षरक्षः महाराष्ट्र लुटला. आता राज्यात भाजपा शिवसेनेचे मजबूत सरकार सत्तेवर आणायचे आहे. 250 प्लस जागा महाराष्ट्रात महायुतीच्या येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लुटणाऱ्यंचा हिशोब चुकत करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांची चौकशीही होणारच आहे. 

घराणेशाहीची कॉग्रेसची परंपरा पवार पुढे चालवतात 

पंतप्रधान नेहरुंच्यानंतर प्रत्येक पंतप्रधान आपल्याच घराण्यातला असावा, असे कॉग्रेसचे राजकारण आहे. कॉग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत बोलू दिले नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांना पुढे येउ दिले नाही. त्यांची ही परंपरा आजही शरद पवार पुढे चालवत आहेत. बारामती लढण्यासाठी त्यांना मुलगीच लागते. मावळसाठी त्यांना पार्थ पवारनेच लढवावे असे वाटते. विधानसभेला रोहित पवारच लागते. तुमच्यातून माणसे बाहेर पडत आहेत. याचे कारण सुरवातीला त्यांच्यकडे पर्यायच नव्हता. सेना -भाजप मजबूत नव्हते. त्यामुळे लोकांनी सहन केले. आता लोक सहन करत नाहीत. भाजपामध्ये येत आहेत, असेही पाटील म्हणाले 

भाजपा भीती दाखवत नाही : पाटील 
भारतीय जनता पार्टी ईडी,इनकम टॅक्‍स यांची भिती दाखवून पक्षात कोणालाही प्रवेश देत नाहीत.राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना स्वताचे कार्यकर्ते स्वता सांभाळता येत नाहीत. त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांना आदर राहिलेला नाही. लोकांन भारतीय जनता पार्टीने हे भक्कम पर्याय उभा केला आहे.त्यामुळेच कार्यकर्ते य पक्षात येत आहेत. भाजपा कोणावर छापे टाकत नाही. असे स्पष्ट करतानाच 31 जुलैनंतर मुंबईत आणि कोल्हापूरातही आपण मोठे राजकीय बॉम्ब फोडणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com