पंधरा वर्षे राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही : चंद्रकांत पाटील

Chandrakant_Patil_
Chandrakant_Patil_

मुंबई : " आगामी पंधरा वर्षे राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता येणार नाही," असे भाकीत भाजपचे प्रदेशाअध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

युती सरकारने गेल्या पाच वर्षात राज्यात केलेल्या विविध विकासकामांमुळे जनतेमध्ये भाजपाविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच अन्य पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, असे वक्तव्य  चंद्रकांतदादा पाटील यांनी  केले . 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या बोधचिन्हाचे अनावरण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, " गेल्या पाच वर्षांत राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र 34 लाख हेक्‍टरवरून वाढून 40 लाख हेक्‍टर झाले. सिंचनाप्रमाणेच विविध क्षेत्रात विकास झाला आहे. शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांचा अनुभव सामान्य माणूस घेत आहे. परिणामी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना भाजपामध्ये प्रवेश करावा असे वाटते. "

आगामी पंधरा वर्षे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता येणार नाही. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी नेत्यांना भाजपासोबत यावेसे वाटते. भाजपामध्ये घाणेरडे राजकारण होत नाही, याची अन्य पक्षातील नेत्यांना जाणीव झाली आहे, असेही ते म्हणाले . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com