पवारांना सांगा....आमचंच सरकार येणार : चंद्रकात पाटील

येणा-या विधानसभेला बारामतीत जिंकणे हा भाजपच्या दृष्टीने हवेतला दावा होईल मात्र लोकसभेच्या निकाला नंतर बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता, 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, बारामतीत नक्की परिवर्तन होईल, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.राज्यात येत्या निवडणुकांनंतर आमचेच सरकार येणार आहे, हे शरद पवार यांना सांगा, त्यांना वाटते आहे, त्यांचेच सरकार येणार आहे, असे प्रतिपादनही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
Sharad Pawar - Chandrakant Patil
Sharad Pawar - Chandrakant Patil

बारामती : येणा-या विधानसभेला बारामतीत जिंकणे हा भाजपच्या दृष्टीने हवेतला दावा होईल मात्र लोकसभेच्या निकाला नंतर बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता, 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, बारामतीत नक्की परिवर्तन होईल, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. राज्यात येत्या निवडणुकांनंतर आमचेच सरकार येणार आहे, हे शरद पवार यांना सांगा, त्यांना वाटते आहे, त्यांचेच सरकार येणार आहे, असे प्रतिपादनही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

बारामतीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या उदघाटनानंतर आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. ते म्हणाले, ''बारामती लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, लोकसभा व विधानसभेला नेहमी असे झाले की दरवेळेस कोणीतरी नवीन माणूस दिला गेला, निवडणूक आल्यावरच प्रयत्न झाले, सातत्याने पाच वर्ष प्रयत्न केले तरच रिझल्ट मिळतात. भाजपचे लोक आपले लोक आहेत, असे बारामतीकरांना वाटायला हवे. पुढील पाच वर्षे सातत्याने लोकांचे काम करण्याची रचना करण्यासाठी कार्यालयाची गरज होती, त्या मुळे बारामतीत कार्यालय सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला.'' 

दर निवडणुकीला परिवर्तन होईल अस वाटायच पण दुर्देवाने ती वेळ काही आली नाही. मात्र या पुढील पाच वर्षांच्या काळात होणारी प्रत्येक निवडणूक बारामती लोकसभा मतदार संघात भाजप तितक्याच ताकदीने लढवेल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी या वेळी केली. 

या छोट्या निवडणुकांतूनच माणसे जोडत आपल्याला पुढे जायचे आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या लोकसभेच्या निकालाच्या वेळेस खुद्द शरद पवार यांनाही सुप्रिया सुळे विजयी होतील याची खात्री वाटत नव्हती, अशी लढत भाजपने दिली, असा दावा त्यांनी केला. 

केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मजबूर नाही तर मजबूत सरकार देण्याचा निर्णय आता लोकांनीच घेतला आहे.  सूत्रसंचालन प्रशांत सातव यांनी, प्रास्ताविक अविनाश मोटे यांनी, स्वागत सुरेंद्र जेवरे यांनी केले. 

बारामतीकरांना आता जरा जास्तच भीती निर्माण झालीय....
पृथ्वीराज जाचकांनी त्यांचा बंगला कार्यालयासाठी दिल्याचा उल्लेख करुन चंद्रकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित जाचकांना म्हणाले, काय तुम्हालाही चार फोन एव्हाना आलेच असतील ना...त्यावर जाचकांनी 2004 मध्ये हाच बंगला भाजपचेच कार्यालय होते अशी आठवण पाटील यांना करुन दिली. त्यावर आता दिवस बदलले आहेत...भीती जरा जास्त निर्माण झालीय, त्या मुळे जेवढं काही होणार नाही तितका प्रयत्न केला जाईल, असा अप्रत्यक्ष टोला पाटील यांनी मारला. 

जरा पवारांना सांगा....
राज्यातही आपलच सरकार येणार आहे, असे म्हणून चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला, की येणार आहे की नाही आपल सरकार....लोकांनी होकार देताच ते म्हणाले, "मग जरा सांगा पवारांना...त्यांना अजून वाटतय की त्यांचेच येणार आहे. पण निवडणुकीनंतर मी नियमित बारामतीला वेळ देणार आहे, लोकांना आपली पार्टी वाटावी, असे काम मी करणार आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com