औरंगाबाद : शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा उल्लेख उडाणटप्पू असा करत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर आज टिका केली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, या मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या मागणी संदर्भात खैरे 'सरकारनामा'शी बोलत होते.
यावेळी खैरे म्हणाले, ''जो आपल्या कुटुंबाचा झाला नाही, तो या शहराचा काय होणार? असा प्रश्न उपस्थित करतानाच शिवसेनेत असतांना संभाजीनगर उल्लेख झाला की हा आमच्यावर टिका करायचा. मग आज कुठल्या तोंडाने मी औरंगाबादचे संभाजीगनर करा अशी मागणी करणार असल्याचे सांगत आहे, असा सवालही खैरे यांनी केला.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे शहरात येत आहेत. नेहमी भूमिका आणि धोरण बदलणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादचे लोक कितपत विश्वास ठेवतील हे देखील बघावे लागेल, असा चिमटा देखील खैरे यांनी काढला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.