गावात गहू वाटणाऱ्या युवा शेतकरी दत्ता पाटील यांचे छगन भुजबळांनी मानले आभार

नाशिक जिल्ह्यातील युवा शेतकरी दत्ता रामराव पाटील यांनी निराधार कुटुंबाना आपल्या शेतातील गहू मोफत उपलब्ध करून दिला. दत्ता रामराव पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून समाजापुढे जो आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे
Farmer in Nashik Distributing Wheat to Needy
Farmer in Nashik Distributing Wheat to Needy

नाशिक : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन सुरु असल्याने गोर गरीब व निराधार नागरिकांना आपल्या शेतातील एक एकरहून अधिक गहू वाटप करून समाजापुढे आदर्श ठेवणारे नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथील युवा शेतकरी दत्ता रामराव पाटील यांचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री .छगन भुजबळ यांनी पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत आभार मानले आहे.

कसबे सुकेने (निफाड) येथील युवा शेतकरी यांनी तीन एकरात गव्हाचे पीक घेतले होते. गव्हाची सोंगणी सुरु असतांनाच देशात 'कोरोना'चा संसर्ग सुरु झाला. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन केले. अशा स्थितीत निफाड तालुक्‍यातील एक मोठे व मोठ्या संख्येने शेतात मजुरी करणारे, रोजगाराच्या शोधात असलेली कुटुंबे या गावात आहेत. त्यांच्यापुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला. रोजगार बंद, घरातच रहायचे. या स्थितीत फउदरनिर्वाह कसा करणार? हे लक्षात आल्यावर दत्ता पाटील यांनी मळ्यात एक एकरातील गव्हाची राशी सामान्यांना वाटून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावातील गरीब, गरजु व मजुरांना हा गहू वाटून टाकला. 

त्यांच्या या उपक्रमाची माहिती मिळाल्यावर तहसीलदारांनीही त्यांची भेट घेऊन यासंदर्भात कौतुक केले. एरव्ही सामान्यतः सरकारविषयी तक्रारी करणाऱ्या शेतकऱ्यांतील हे दातृत्व समजल्यावर सगळीकडे त्यांची चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी खेडगाव येथील संजय उगले या शेतकऱ्याने देखील सिमला मिरची बाजार समितीत विक्रीला नेली होती. त्याला वीस किलोच्या क्रेटला अवघा पंधरा रुपयांचा दर सांगितला गेला. त्यावर त्यांनीही हा शेतमाल परत गावात नेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेतमजूर व गरीबांना वाटून टाकला होता.

देशभरात कोरोना विषानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कुठलाही गोरगरीब, शेतकरी, मजूर, बेघर, विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी महाविकास आघाडी सरकार विशेष प्रयत्न करत असून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चोवीस तास मदत केंद्र सुरु करण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडविले जात आहे.

अशातच शासनासोबतच आपणही आपले कर्तव्य समजून सामाजिक भान ठेवत नाशिक जिल्ह्यातील युवा शेतकरी दत्ता रामराव पाटील यांनी निराधार कुटुंबाना आपल्या शेतातील गहू मोफत उपलब्ध करून दिला. दत्ता रामराव पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून समाजापुढे जो आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. याबाबत भुजबळ यांनी दत्ता रामराव पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करत त्यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक करून आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com