भुजबळ म्हणतात 'सीएम हे बरे नव्हे'! (व्हिडिओ)
नाशिक : ''पुणे शहर राज्याचे औद्योगिक, भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे. ते पुराच्या संकटात आहे. त्यावर उपाययोजनेस प्राधान्य हवे. मात्र पुणेकरांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या तिकीटवाटपासाठी दिल्लीला गेले आहेत. हे योग्य नव्हे. तिकीटवाटप दोन दिवसांनी झाल्याने बिघडले नसते,'' असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केले.
ते म्हणाले, ''यापूर्वी कोल्हापूर, सांगलीला महापूर आला होता. सबंध शहर संकटात सापडले होते. तेव्हा सुरवातीचे दोन दिवस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेत होते. त्यांनी वेळीच लक्ष घातले असते तर उपाय योजना झाली असती. अलमट्टी धरणाची दारे उघडली असती. सांगली व कोल्हापूरच्या संकट वाढले नसते. आज तिथे एव्हढी समस्या आहे की नागरिकांना पुन्हा उभे राहण्यासाठी पाच- दहा वर्षे लागतील. पुणे शहर पुराच्या संकटात आहे. अनेक जागतिक दर्जाचे वाहन प्रकल्प पुण्यात आहेत. महत्वाचे प्रकल्प, संस्था आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. ते लवकर लक्ष घालून पुर्वपदावर आणणे ने आवश्यक आहे.''
हे देखिल वाचा - शिवसेनेला हव्यात 'या' पाच जागा; भाजपच्या भूमीकेकडे लक्ष
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.