पाच वर्षे काम न केल्यानेच 'भाजप'वर आंदोलनाची वेळ; पंकजांना भुजबळांच्या कानपिचक्या

मराठवाडयाच्या पाणीप्रश्नासाठी औरंगाबादला भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे त्यावर छगन भुजबळ यांनी टिका केली आहे
Chagan Bhujbal Criticism on Pankaja Munde Over Agitation
Chagan Bhujbal Criticism on Pankaja Munde Over Agitation

नाशिक : ''पाच वर्षात त्यांनी (भाजप) कामे केली असती, तर कदाचित आज आंदोलन करण्याची वेळ आली नसती. लोकशाही असल्याने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. या आंदोलनाकडे आम्ही सकारात्मकतेने पाहतो. काही तरी अडचणी असल्याशिवाय कोणी सत्याग्रह करत नाही. मात्र पाणी प्रश्‍नावर आंदोलनाऐवजी सगळयांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता आहे,'' असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केले.

मराठवाडयाच्या पाणीप्रश्नासाठी औरंगाबादला भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे. यासंदर्भात श्री. भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत येवून दोन अवघे दोन महीने झाली आहेत. असे असतांना गेले पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपवर आंदोलनाची वेळ आली आहे. तेव्हा कामे केली असती तर ही वेळ आली नसती, असे ते म्हणाले.

श्री. भुजबळ पुढे म्हणाले, ''नाशिकमधून मराठवाड्याला यंदा तब्बल 111 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाडयाला कमी पाणी गेलेले नाही. पाणीप्रश्नावर आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्राला अधिकाधिक पाणी कसे मिळेल यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची आता गरज आहे. राज्यात पडणाऱ्या पावसातील सुमारे दीडशे ते दोनशे टीएमसी पाणी गुजरातला वाहून जाते. यापूर्वीही मी सभागृहात महाराष्ट्राच्या हक्काच्या पाणीप्रश्नावर आवाज उठवला होता. राज्याच्या हक्काच्या पाण्याचा एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही अशी भुमिका मी त्यावेळी मांडली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातला एक थेंबही जाऊ देणार नाही असे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात पाण्यासाठीचा सामंजस्य करार मात्र बदलला.''

पाणीप्रश्‍नी लवकरच बैठक

ते पुढे म्हणाले, ''ज्याच्या भागात पाणी पडते ते पाणी त्या राज्याचे हा नियम आहे. त्यानुसार आपल्या जमीनीवरचे पाणी जर आणले तर राज्याच्या प्रश्न मार्गी लागू शकतो. गुजरातला एकही थेंब पाणी जाता कामा नये याकरीता सर्वांनी जर प्रयत्न केले पाहिजे. त्यातून नाशिकसह मराठवाडा आणि राज्याचाही प्रश्न सुटू शकेल. यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी मी चर्चा केली आहे. याबाबत लवकरच एक स्वतंत्र बैठक घेणार आहोत. या बैठकीत या विषयातील तज्ञ, लोकप्रतिनीधींचा सामावेश असेल. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी वळविण्यासाठी एक योजना तयार केली जाणार आहे. याकरीता मोठा खर्च आहे. परंतु पाणी जर निघून गेले तर आहे त्याच पाण्यात गरज भागवावी लागेल. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून निर्णय घेवून राज्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com