माझ्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्यांची जनता हकालपट्टी करणार : शरद बुट्टे पाटील 

माझ्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्यांची जनता हकालपट्टी करणार : शरद बुट्टे पाटील 

आंबेठाण : त्यांचा आणि माझा पक्ष वेगळा आहे. तरीही मित्र पक्षातील लोक माझ्या हकालपट्टीची मागणी करीत आहे. असल्या लबाडांशी युती करण्यापेक्षा मातीशी केलेली युती अभिमानास्पद आहे. ज्यांनी आमच्या पक्षाकडे माझ्या हकालपट्टीची मागणी केली आहे त्यांचीच हकालपट्टी जनता येत्या २४ तारखेला करणार आहे, असा प्रतिहल्ला जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी कडूस ( ता. खेड ) येथे शिवसेनेवर केला आहे.

जिह्यातील एकमेव अपक्ष आमदार अतुल भाऊंच्या रूपाने निवडून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  बुट्टे पाटील म्हणाले की आमच्या पक्षात लुडबुड करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचे जनमत तुम्ही स्वत:हून कमी केले आहे. मागील काळात तुमच्या बरोबर असणारे रामदास ठाकूर, अतुल देशमुख, राम गावडे, बाबा राक्षे आज तुमच्याबरोबर का नाही ? याचे आत्मपरीक्षण करण्याचे सोडून माझ्या हकालपट्टीची मागणी हास्यास्पद आहे.

त्यांच्या पक्षातील निष्ठावंत लोकांना त्यांनीच बाहेर पाठविले आहे. आम्ही कामे केली म्हणून मतदान मागत आहे. परंतु अनेक गावांत यांचा दमडी देखील निधी मिळाला नाही. जनतेला खोटी पत्र दिली पण आता जनता हुशार झाली आहे. 
यांची पाच वर्ष केवळ विनोद करण्यात आणि निष्क्रियेत निघून गेली. यांना स्वत:ची कमतरता दिसत नाही आणि आमच्यावर टीका करतात.जिल्ह्यात सर्वात जास्त 'क' वर्ग तीर्थक्षेत्र खेड तालुक्यात आम्ही मंजूर करून घेतली आहेत.

यावेळी उमेदवार अतुल देशमुख,दिलीप मेदगे, कैलास गाळव,संजय रौधळ,नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, योगेश गावडे,बाळासाहेब शिंदे,सुनिल देवकर,दत्तात्रय मांडेकर,अश्विनकुमार भंडलकर,चंद्रकांत शिंदे,नगरसेवक विशाल ससाणे,अशोक नाईकरे,रघुनाथ लांडगे,शाबीर मुलाणी सुषमा अरगडे,सबाजी मेदगे,माऊली धायबर, प्रकाश कालेकर,मंगेश गुंडाळ,पंडित गोडसे,रामदास सावंत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

अतुल देशमुख म्हणाले की या दोघांपैकी एक म्हणतो शेवटची संधी द्या तर दुसरा म्हणतो अजून पाच वर्षे द्या. पण जनतेची कामे केली की जनता आपोआप संधी देत असते. चाकण एमआयडीसीत जर आख्खा महाराष्ट्र चालत असेल तर तालुक्यातील तरुणांना नोकऱ्या का मिळत नाही. खेड बाजार समिती राष्ट्रवादीवाल्यांनी खाल्ली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि परिवर्तनासाठी साथ द्या त्याबळावर राजगुरूंच्या क्रांतिभूमीत बदल घडू.
 

कैलास गाळव म्हणाले की ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून गरीब घरातील मुलाला आमदार करण्याचे आवाहन केले. 
दिलीप मेदगे यांनी आजी-माजी आमदारांना घरी बसवायचे असून आळंदी,राजगुरूनगर शहरासाठी आजी-माजींनी काय केले असा सवाल उपस्थित केला. तसेच प्रामाणिक उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com