.....तर शिवसेनेला आमच्या शुभेच्छा - चंद्रकांत पाटील
मुंबई - राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा अधिक गुंतागुंतीचा बनला असून आपण सरकार स्थापन करु शकत नाही, असे भाजपने राज्यपालांना सांगितले असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
भाजपने कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, "नुकत्याच झालेल्या निवणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या युतीला जनतेने भरघोस जनादेश दिला. म्हणूनच राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो, जनादेश महायुतीला मिळाला. पण शिवसेनेला बरोबर येण्याची इच्छा नाही. त्यामुळे आत्ता आम्ही सरकार स्थापन करु शकत नाही," असे आम्ही राज्यपालांना सांगितले. जनादेशाचा अपमान करुन शिवसेनाला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करायचे असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत, असेही ते म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.