मुंबई : राज्यात पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष 52 पंचायत समित्यांमध्ये यश मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून अन्य पक्ष याबाबतीत भाजपापेक्षा खूप मागे राहिल्याचा दावा भाजपने केला आङे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांचे सरकार आल्यानंतर पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका चुरशीने झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात यावरून गुन्हे दाखल झाले. सत्ताधारी तीन पक्षांनी एकत्र येऊन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तरी पक्षाने पहिला क्रमांक राखलच्या म्हटले आहे.
राज्यातील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकांच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये भाजपा 52 पंचायत समित्यांमध्ये यश मिळवून पहिल्या स्थानावर आहे. याखेरीज सात पंचायत पंचायत समित्यांमध्ये भाजपाला इतरांसोबत आघाडी करून यश मिळाले आहे. भाजपाशी स्पर्धा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (34 पंचायत समित्या), शिवसेना (31 पंचायत समित्या) आणि काँग्रेस (23 पंचायत समित्या) हे पक्ष मागे पडले आहेत. ग्रामीण भागात भाजपाचा भक्कम असल्याचे या निकालातून दिसून आले आहे, असे भाजपने म्हटले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.