पुणे - नगरमध्ये भाजपला विखे फॅक्टरचा कुठेही फायदा झाला नाही किंबहुना तोटा झाला, असे विधानासभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेले माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले.
मुंबईत होणाऱ्या प्रदेश भाजपच्या आजच्या बैठकीत पाच ते सहा जिल्ह्यांच्या कोअर कमिट्यांच्या बैठका होणार आहेत. त्यामध्ये नगर जिल्हयाचीही बैठक होत आहे. या बैठकीत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत आलेल्या तक्रारींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आलेल्या तक्रारींवरून विखे पाटील यांच्यावर काही कारवाई होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विखे फॅक्टरबाबत टीव्ही9 मराठीशी बोलताना राम शिंदे म्हणाले, ``जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आलेल्या अडचणींबाबत प्रदेशचे प्रतिनिधी आशिष शेलार यांच्याकडे तक्रारी मांडलेल्या आहेत. विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा जिल्ह्याला झाला नाही. जिल्ह्यात पूर्वी पाच आमदार होते. त्यानंतर विखे आणि पिचड भाजपमध्ये आल्यामुळे ही संख्या सातवर पोचली. निवडणुकीनंतर ही संख्या वाढणे अपेक्षित होते. मात्र ही संख्या तीनवर आली आहे. पूर्वीचे चार आमदार पडले आणि नवीन एक आमदार पडला. त्यामुळे विखे फॅक्टरचा नगरमध्ये कुठेही फायदा झाला नाही किंबहुना तोटाच झाला.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.