अजूनही चंद्रकांतदादा म्हणतात, भाजपच राज्यात नंबर वन ! 

महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वाधिक 1 कोटी 42 लाख मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला 92 लाख तर शिवसेनेला 90 लाख मते मिळाली आहेत. अपक्षांसह भाजपचे 119 आमदार आहेत. राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल आणि पाच वर्षे राहील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
अजूनही चंद्रकांतदादा म्हणतात, भाजपच राज्यात नंबर वन ! 

मुंबई ः महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वाधिक 1 कोटी 42 लाख मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला 92 लाख तर शिवसेनेला 90 लाख मते मिळाली आहेत. अपक्षांसह भाजपचे 119 आमदार आहेत. राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल आणि पाच वर्षे राहील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

भाजप आणि मित्रपक्षांच्या आमदारांच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर चंद्रकांतदादा पाटील पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 105 आणि अपक्ष व सहयोगी 14 आमदार एकत्र आहेत. त्यामुळे 119 आमदारांना बाजूला ठेवून कोणालाही सरकार बनवता येणार नाही. भाजपच्या नेतृत्वातील सरकार राज्यात सत्तेवर येईल आणि पाच वर्षे पूर्ण करेल. 

श्री. पाटील पुढे म्हणाले, 2014 मध्ये भाजपने 260 जागा लढविल्या होत्या आणि 122 आमदार निवडून आले होते. यावेळी 164 भाजपने लढविल्या आणि 105 आमदार निवडून आले आहेत म्हणजे आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांतही भाजपचे सर्वाधिक 12 आमदार आहेत. अनुसूचित जातीच्या आमदारांतही भाजपचे सर्वाधिक 9 आमदार आहेत. अनुसूचित जमातीच्या आमदारांतही भाजपचे सर्वाधिक 9 आमदार आहेत. 

भाजपने बाहेरून आलेल्या 26 जणांना उमेदवारी दिली त्यांपैकी 16 जण निवडून आले आहेत. सगळे पडले हा प्रचार खोटा आहे. 59 जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला. त्यापैकी 55 जागांवर भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले, असेही ते म्हणाले. 

1990 नंतर कोणत्याही पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नव्हत्या. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे मिळून सुद्धा 98 च आमदार होतात, 100 ला दोन कमीच पडतात. भाजपने मात्र लागोपाठ दुसऱ्यांदा 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले आहेत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र आणि सरकार मदत देईलच पण 23 हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण शेतकऱ्यांना आहे, असे सांगून श्री. पाटील पुढे म्हणाले, विम्याची रक्कम शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. 

राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावर निवडणूक लढवली. देशात आणि परदेशात भारताची बदनामी केली. आता सर्वोच्च न्यायालयाने राफेलबाबत दिलेल्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे. यासाठी भाजपतर्फे प्रत्येक जिल्ह्यात राहुल गांधींच्या विरोधात "माफी मांगो' आंदोलन केले जाईल, अशीही माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com