प्रशांत बंब शेतकऱ्यांसाठी राबवणार ' कर्जमाफी पुर्णत्वाकडे'अभियान 

.
 प्रशांत बंब शेतकऱ्यांसाठी राबवणार ' कर्जमाफी पुर्णत्वाकडे'अभियान 

गंगापूरः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या तसेच कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतक-यांसाठी गंगापूर-खुलताबाद मतदार संघात भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या वतीने 'कर्जमाफी पूर्णत्वाकडे' हे अभियान राबवण्यात येणार आहे. पत्रकारांशी बोलतांना बंब यांनी ही माहिती दिली. 

शेतकरी कर्जमाफी योजनेपासून अद्यापही राज्यातील अनेक शेतकरी वंचित असल्याचे समारे आले होते. त्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यानूसार आता शेतकरी कर्जमाफीसाठी "कर्जमाफी पुर्णत्वाकडे' ही मोहिम राबवण्यात येणार आहे. 

यासंदर्भात माहिती देतांना प्रशांत बंब म्हणाले, गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील 22 हजार 464 शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ दिला आहे. तसेच नवीन सुधारित धोरणा प्रमाणे मतदारसंघातील आणखी सुमारे 35 हजार 588 शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. "कर्जमाफी पूर्णत्वाकडे' या अभियानांतर्गत लासूर, गंगापूर, वाळूज तसेच खुलताबाद येथे अर्ज भरणाकेंद्राद्वारे 72 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन 15 ऑगस्ट पासून या अभियानाची सुरुवात होणार आहे. यासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती नेमण्यात आली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 

शासनाच्या सुधारित धोरणाप्रमाणे 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2016 पर्यंत उचल केलेल्या मध्यम, मुदत व पुर्नगठीत कर्जांच्या पिक कर्ज घेतलेल्या तसेच 31 जुलै 2017 पर्यंत थकीत असणा-या शेतक-यांना सरसकट कर्ज माफी मिळणार आहे. त्याच प्रमाणे 31 मार्च 2016 ते 31 जुलै 2017 पर्यंत पुनर्गठीत कर्जांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

31 मार्च 2016 पूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांपैकी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज केला आहे मात्र, कर्ज माफी झाली नाही, किंवा ज्या कुटुंबात एकापेक्षा जास्त कर्जदार शेतकरी आहेत, अशा शेतक-यांना राज्यसरकारच्या नवीन सुधारित धोरणाप्रमाणे कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचेही बंब यांनी स्पष्ट केले. 

ज्या शेतकरी बांधवांनी 31 मार्च 2016 पूर्वी कर्ज घेतले आहे व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीसाठी याआधी अर्ज केले आहेत, पण योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्वांनी अर्ज भरुन द्यायचे आहेत. सदरील अर्ज भरण्यासाठी शेतकरी बांधवांनी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन सादर-केलेल्या अर्जाचे प्रत सोबत आणणे आवश्‍यक असल्याचेही बंब यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com