अंडी खाणारी मुले नरभक्षक बनतील : भाजप नेत्याचा शोध

अशा महान ज्ञानी नेत्याला आणखी जबाबदारी द्यायला हवी....
अंडी खाणारी मुले नरभक्षक बनतील : भाजप नेत्याचा शोध

भोपाळ : मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांच्या सरकारने अंगणवाडीतील मुले आणि गर्भवतींना अंडे देण्याचा अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मांसाहार करणे निषिब्ध आहे. जर लहान वयातच मुलांना अंडे खाण्याची वाईट सवय लावली तर पुढे जाऊन ते नरभक्षक होतील, असे वक्‍तव्य भाजपचे नेते आणि मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी केले आहे.

लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी देण्यात येत असलेले बहुगुणी अंडे अंगणवाडीतील मुलांना देण्यास मध्य प्रदेशमध्ये भाजपने विरोध केला आहे.

मुलांना पोषण आहार देण्यासाठी अनेक पर्याय आहेत. अंगणवाडीतील मुलांना अंडे देण्याचा विचार यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. भाजपचे सरकार असताना हा विषय समोर आला होता. मात्र, आपली संस्कृती शाकाहारी आहार करण्याची आहे. अंडे हा एक मांसाहार करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मी याला विरोध केला होता, असे गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे. भार्गव यांच्याअगोदर राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनीही विरोध केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com