लातूर : कॉंग्रेसच्या देशातील युवराजांना केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पराभूत करून जामीनीवर आणले, आता लातूरच्या युवराजांना जमीनीवर आणा असे आवाहन पालकमंत्री संभाजीपाटील निलंगेकर यांनी केले.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ बुधवारी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांची शहरात जाहीर सभा झाली. इराणी यांच्या भाषणापुर्वी निलंगेकरांनी कॉंग्रेस उमेदवारावर तोफ डागली.
निलंगेकर म्हणाले की, ''लातूरचा पाणीप्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. मांजरा नदीचे पाणी लातूरहून पुढे निलंग्यात येते. आज निलंग्यात पाणी शिल्लक आहे, लातूरचे तुमच्या हक्काचे पाणी कोणी चोरले? लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या कारखान्यांनी हे तुमच्या हक्काचे पाणी चोरले.'' लातूरला दुष्काळमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मैदानावर झालेल्या जाहीर सभेत लातूरकरांना दिल्याची आठवण निलंगेकरांनी उपस्थितांना करून दिली.
''कॉंग्रेस आमदारांची पार्श्वभूमी जनतेला माहिती आहे. तुम्ही काय विकास केला हेही जनतेला माहित आहे. तुम्ही स्वतःच्या मालकीचे कारखाने काढले. पण भाजपने मात्र रेल्वे बोगी सारखा कारखाना आणून जनतेला न्याय दिला. या कारखान्यामुळे परिसरातील लेकराना नोकऱ्या मिळणार आहेत,'' असे सांगतानाच लातूरचा आमदार भाजपाच होणार असा विश्वास देखील निलंगेकरांनी व्यक्त केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.