विशिष्ट धर्मियांना ‘टार्गेट’ करण्यासाठीच भाजपाने सीएए कायदा आणला : अशोक चव्हाण  

निवडणुकांच्यावेळी योग्य लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे असते. काँग्रेस पक्ष व जिल्हयातील अल्पसंख्य समाज यांचे अतुट असे नाते आहे. मुस्लिम समाजाच्या सुख-दु:खामध्ये आम्ही नेहमी सहभागी असतो. इदगाह मैदानावर हस्तांलोंदन करुन शुभेच्छा देणारे जिल्हयाचे खासदार या प्रश्नावर मूग गिळून का बसले आहेत? असा सवालश्री. चव्हाण यांनी उपस्थित केला .
ashok-chavan-@-Nanded
ashok-chavan-@-Nanded

नांदेड :  भारतामध्ये लोकशाही आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार प्रत्येक नागरिकास या देशात राहण्याचा अधिकार आहे. परंतु भाजपाने मात्र जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करुन अल्पसंख्यांकामध्ये भीतीचे वातावरण तयार केले आहे. देशामध्ये जेव्हा सीएए कायदा केवळ पाशवी बहुमतांच्या बळावर पारित करण्यात आला. 


तेव्हाच काँग्रेसच्यावतीने श्रीमती सोनिया गांधी यांनी तीव्र विरोध दर्शविला. या कायद्यामुळे देशामध्ये अराजकता वाढणार आहे. विशिष्ट धर्मियाना ‘टार्गेट’ करण्यासाठीच भाजपाने हे दोन्ही कायदे मंजूर करुन घेतले आहेत. सीएए सारखा संविधानविरोधी कायदा राज्यात लागू होवू देणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये दिली.


नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीएए, एनआरसी, एनपीआर च्या विरोधात मागील सहा दिवसांपासून सर्वपक्षीय बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंत्री चव्हाण यांनी रविवारी (ता. १९) रात्री आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. 


त्यांच्यासमवेत माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांची उपस्थिती होती.


 श्री. चव्हाण म्हणाले की, देशामध्ये जेव्हा सीएए कायदा केवळ पाशवी बहुमतांच्या बळावर पारित करण्यात आला. तेव्हाच काँग्रेसच्यावतीने श्रीमती सोनिया गांधी यांनी तीव्र विरोध दर्शविला. या कायद्यामुळे देशामध्ये अराजकता वाढणार आहे. विशिष्ट धर्मियाना ‘टार्गेट’ करण्यासाठीच भाजपाने हे दोन्ही कायदे मंजूर करुन घेतले आहेत. 


लोकसभेमध्ये जरी भाजपाला बहुमत असले तरी अशा निर्णयामुळे जनतेत मात्र त्यांच्याविषयी मत चांगले राहिलेले नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाचे मनुष्यबळ आवश्यक असते. राज्य शासनाच्या सहमतीशिवाय अशा कायद्याची अंमलबजावणी शक्य नाही. महाराष्ट्रामध्ये जरी तीन पक्षाचे सरकार असले तरी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस पक्ष समर्थपणे विरोध करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आपल्या मताचा कोण  कोणत्या कारणासाठी वापर करुन घेतो याची जाणिव यानिमित्ताने सर्वानिच ठेवणे आवश्यक आहे. भाजपासारख्या धर्मांध व जातीवादी पक्षाना पाठबळ देण्याचे काम इतर काही राजकीय पक्ष व समाज घटकांकडून होत असते. त्यामुळेच केवळ मतविभाजणाच्या जोरावर भाजपाला संसदेमध्ये पाशवी बहुमत मिळाले आहे. या पाशवी बहुमतांचा गैरवापर करत सीएए सारखे संविधान विरोधी कायदे मंजूर केल्या जात आहेत याची जाणिव आपणास असली पाहिजे असेही ते म्हणाले.


यावेळी डी.पी.सावंत, अमरनाथ राजूरकर, मोहन हंबर्डे, मुफ्ती आयुब कासमी आदींची सीएए विरोधी भाषणे झाली. अ‍ॅड. शाहेद यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी माजी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, मसूद खान, शमीम अब्दुल्ला, मुन्तजीब, शेरअली, मोहमंद नासेर, अब्दुल लतिफ, हबीब बागवान, हफीज बागवान, हबीब मौलाना, डॉ.अर्शिया कौसर, बाबू खोकेवाले, अब्दुल गफार आदींची उपस्थिती होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com