`महाविकास' नव्हे; "महाभकास' आघाडी`

...
devendra fadanavis
devendra fadanavis

जळगाव : राज्यातील "महाविकास' आघाडी सरकार ने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या नावाखाली तोंडाला पाने पुसली आहेत, सात बारा अद्याप कोरा केलाच नाही. युती सरकारच्या काळातील "विकास'कामे बंद केली आहेत. राज्यातील हे सरकार "महाभकास'आघाडी सरकार आहे.त्यांच्या विरोधात मंगळवार (ता.25) रोजी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी दिली.

जळगाव येथे भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी भाजप महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, डॉ.विजय धांडे, मनोज भांडारकर उपस्थित होते.

यावेळी माहिती देतांना हरिभाऊ जावळे म्हणाले, जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या सरकारच्या राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे महिला, तरूणीमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या सरकारविरोधात जनतेत निराशा निर्माण झाली आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे मंगळवार (ता.25) जिल्हाभरात तहसील कार्यालयावर सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील आमदार, खासदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com