...मागे वळून पाहण्याची धनंजय मुंडे यांची सवय गेली नाही!

पंकजामुंडे यांनी स्वतःची दृष्टी आणि नियोजनसमोर ठेऊन जिल्हयासाठी काम केले.इतरांना दोष दिला नाही. तर,स्वतःचा कुठलाही अजेंडा न देता पहिली बैठक वाया घातली, असा आरोप भाजप नेत्यांनी केला.
beed dpc meeting : Bjp criticizes dhananjay munde
beed dpc meeting : Bjp criticizes dhananjay munde

बीड : पंकजा मुंडे यांनी गेल्या पाच वर्षांत रेल्वे, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग आदी बीड जिल्हयाच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आणि निधीचा आकडा  मोठा आहे. तरीही किरकोळ बाबी सांगून तुम्ही तुमची प्रवृत्ती दाखवली आहे. पाच वर्षात पंकजा मुंडे यांनी कधीही त्यांच्या आधीच्या पालकमंत्र्यांना दोष दिला नाही, मागच्या सरकारचे वाभाडे काढले नाही. स्वतःची दृष्टी आणि नियोजन समोर ठेऊन काम केलं, याऊलट स्वतःचा कुठलाही अजेंडा न देता नव्या पालकमंत्र्यांनी नियोजन समितीची पहिलीच बैठक वाया घातली, असा आरोप भाजप नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.

मागे वळून पाहण्याची धनंजय मुंडे यांची सवय गेली नसल्याचा टोला लगावत त्यांनी  विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावे, असे आवाहन देखील पत्रकात करण्यात आले. शुक्रवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊन 336 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत श्री. मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या कार्यकाळातील निईजनावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. प्रशासकीय मंजुरी आणि प्रस्ताव नसलेल्या कामांना त्यांनी स्थगिती देखील दिली. त्याला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

पंकजा मुंडे यांनी जिल्हयात केलेले काम तुम्हाला डोंगर दऱ्यात फिरताना, हाय-वे वर फिरताना ,विम्याचे पैसे घेताना दिसले नाही का, असा सवाल करत तुम्हाला विकासाचं अंधत्व आल्याचा टोलाही लगावला आहे. कोणताही आराखडा मान्य केल्यावर त्याचे सर्व पैसे रिलीज होत नसतात, ते टप्प्यानेच दिले जातात हे तुम्हाला माहीत नसेल. रेल्वे, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, जलयुक्त शिवार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इमारती, तीर्थक्षेत्र विकास तसेच इतर योजनांचा निधी मंजूर झाला तरी तो टप्प्या टप्प्यानेच आला आणि त्यातून कामे झाली असेही जिल्हा परिषदेचे मावळते सभापती संतोष हंगे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वतःचा कुठलाही अजेंडा न देता पहिली बैठक वाया घातली, मागे वळून पाहण्याची त्यांची सवय गेली नसल्याचा टोलाही हंगे यांनी लगावला आहे.   निवडणूकीत गलिच्छ भाषा वापरून तुम्ही  तुमच्या प्रवृत्तीच दर्शन दिलंच आहे. आता याचंच प्रदर्शन जिल्ह्यातील जनतेला होत राहणार. सुरक्षा ,सन्मान आणि विकासाचं राजकारण हरवत जाईल, अशी भीती जनतेला वाटत आहे त्यामुळे बीडची जनता हवालदिल झाली आहे, सूडाच्या राजकारणाचा दुर्गंध यातुन येत आहे अशी टीका हंगे यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com