मुंबई : बेलापूर ,कागल, माण आणि पिंपरी या जागांबाबत शिवसेना आणि भाजपमधील मतभेद कायम राहिल्याने जागा, आकडे या घोळात न जाता आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्याचा भाजपने सुचवलेला पर्याय शिवसेनेने रात्री उशीरा मान्य केला आहे.
१२६ जागांशिवाय बेलापूर व माण हा आग्रह सेनेने शेवटपर्यंत न सोडल्याने अखेर सच्च्या मित्रांनी आकड्यात शिरायचेच का, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. समसमान जागांचे आश्वासन भाजपने पाळले नाही, हे चित्र सेनेसाठी अडचणीचे ठरेल, अशी कैफियत सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.
तिची दखल घेत संयुक्त पत्रकार परिषद नंतर घेवू. आता एक पत्रक जारी करू, असे ठरले. युतीत आपल्याला मान नाही, अशी तीव्र प्रतिक्रीया आज पक्षप्रमुख उद्धव यांनी सेनेच्या मंत्र्यांसमोर मांडली. मात्र युतीतच भले असल्याचे या नेत्यांचे मत होते. अखेर स्वपक्षातील मत लक्षात घेत उद्धवजींनी युतीवर शिक्कामोर्तब केले. रात्री मोदी, शहा, फडणवीस व पाटील यांच्यात बोलणी सुरु होती. सेनेच्या आग्रहानंतर आता पुढचा मार्ग काय भाजपच्या जागा युतीत लढताना कशा वाढणार, यावर लक्ष दिले जाणार आहे. चार ते आठ मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती होण्याचीही शक्यता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.