उद्धव ठाकरेंना अनेक गोष्टी कळून चुकल्या!

सेना सोडल्यानंतर 15 वर्षानी उद्धव ठाकरेसोंबत झालेल्या तासभर झालेल्या भेटीत 2004 मध्ये शिवसेना का सोडावी लागली, यावर चर्चा झाली.
उद्धव ठाकरेंना अनेक गोष्टी कळून चुकल्या!

चिपळूण (रत्नागिरी): शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी रविवारी (ता. 25) भेट झाली, ही घटना खरी आहे. त्यांनी शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांच्या निमंत्रणावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

भास्कर जाधव म्हणाले, रविवारी (ता.25) ठाकरेंसोबत अचानकपणे भेट झाली. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरेंशी दुरध्वनीवरून संवाद सुरू होता. मात्र प्रत्यक्षात भेट झाली नव्हती. 2004 मध्ये शिवसेना कशामुळे सोडावी लागली. त्यावेळी नेमके काय-काय घडले, यावरच भेटीत चर्चा झाली. त्यावेळचे खरे काय आणि खोटे यकाय याची माहिती घेतली. ठाकरेंनाही अनेक गोष्टी कळून चुकल्या. या चर्चेमुळे 15 वर्षानी मनात असलेले दडपण, जळपट निघून गेले. चर्चेदरम्यान ठाकरेंनी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यावर आपण कसलीही प्रतिक्रीया दिलेले नाही. कुटुंब आणि मतदार संघातील कार्यकर्ते पदाधिकार्‍यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ. गेल्या चार दिवसापासून गुहागर मतदारसंघासह राज्यातील हितचिंतक दुरध्नीवरून संपर्क साधू लागले आहेत. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असेल, तुम्ही तिथे आम्ही, अशा लोकांच्या प्रतिक्रीया येत असल्याचे आमदारांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी दुरध्वनीवरून आपले बोलणे झाले. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. शिवसेना प्रवेशाचा निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांच्या सल्ला मसलतीनंतर काय ते पाहू 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com