बीड : ''भाजपची महाजनादेश यात्रा ही पारंपारिक आहे. विरोधात असताना आम्ही संघर्षयात्रा काढतो तर सत्तेत असताना संवाद यात्रा काढतो. भाजप - शिवसेना युतीबाबत लोकसभा निवडणुकी अगोदरही माध्यमांनी चर्चा केली. पण, आम्ही एकाच दिवसात चर्चा करुन युती केली. यावेळीही युती कधी होईल हे कळणारही नाही," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा सोमवारी (ता. २६) जिल्ह्यात पोचून आष्टी व बीडला सभा झाल्या. बुधवारी (ता. २७) सकाळी त्यांनी महाजनादेश यात्रेबाबत माध्यमांना माहिती दिली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, यात्रेचे संयोजक आमदार सुरजितसिंह ठाकूर, संगीता ठोंबरे, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, सुरेश धस, सविता गोल्हार, रमेश पोकळे, केशव उपाध्ये उपस्थित होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ''भाजपमध्ये मेगाभरती आणि विरोधकांची मेगागळती सुरु आहे. प्रवेशाबाबत आमची 'फिल्ट्रेशन पॉलीसी' आहे. जे लोक जास्त दिवस आमच्यासोबत राहू शकतात, जिथे आमच्या वाट्याची जागा आहे, अशाच ठिकाणी आम्ही प्रवेश देत आहोत.'' काही ठिकाणी मित्रपक्ष शिवसेनेत प्रवेश होत असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी महाजनादेश यात्रा आणि विकास कामांचाही उहापोह केला. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य, संवाद आणि काँग्रेसच्या पर्दाफाश यात्रेवरही त्यांनी टीका केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.