मुंबई : शिवसेना प्रत्येक वेळी एक पाऊल मागे का घेते कळत नाही. त्यांची राज्यात जी ताकद आहे ती का दाखवत नाहीत कळत नाही ? ही चिंता कोणी शिवसेना नेत्यांनी नव्हे तर कॉंग्रेसचे प्रदेषशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप आणि शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते फोडले आहेत. विशेषत: कॉंग्रेस खिळखिळी करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. कॉंग्रेस निवडणुकीत मोठी भरारी घेण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी कंबर कसण्याची गरज असताना थोरात यांना शिवसेनेने भाजपला ताकद दाखवावी असे वाटते. म्हणजेच भाजप समोर शिवसेनेने शरण जाऊ नये. शिवसेनेची राज्यात ताकद असल्याचे थोरात यांनी मान्य केले आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस 125 आणि 125 जागांवर लढणार आहोत असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, की मित्र पक्षाला यातील जागा देण्याची वेळ आली तर त्यातील
जागा दिल्या जातील. कोणाला किती जागा त्यापेक्षा निवडून कसे येता येईल याकडे आमचे लक्ष आहे. येत्या 20 तारखेला पहिली यादी जाहीर होईल असेही ते म्हणाले.
उर्मिला मातोंडकर यांच्याशी आमचा अल्प परिचय होता. त्या कॉंग्रेस पक्षाच्या पुरोगामी विचाराच्या आहेत. त्यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला असला तरीही त्या कॉंग्रेससाठीच काम करतील असा विश्वासही थोरात यांनी यावेळी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.