मुंबई: महाराष्ट्रामध्ये सध्या काळजीवाहू सरकार आहे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांची काळजी करत नाही, असा टोला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
राज्यपालांची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर घणाघाती टीका केली . बाळासाहेब थोरात म्हणाले , राज्यामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे मोठे संकट आहे . कोकणामध्ये भात पिकाचे नुकसान झालेले आहे . सोयाबीन हातचे गेले आहे . फळबागांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. गेले वर्षे दुष्काळात होते हे वर्ष अतिवृष्टीचे झालेला आहे.
पिक विमा कंपन्या या खाजगी आहेत. त्या शेतकऱ्यांना काही हाती लागू देत नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांना मदत मिळवून द्यायला हवी. पिक विमा कंपन्यांकडून सरकारने त्यांना चांगली मदत मिळवून द्यायला हवी .
श्री. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली ,सातारा भागातील महापुराचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केंद्र सरकारकडे सहा हजार 800 कोटी रुपये राज्य सरकारने मागितले . परंतु अजून यातला एक रुपयासुद्धा खाली सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला नाही . त्यामुळे आता सुरु असलेल्या अतिवृष्टीचे पैसे तातडीने यावेत आणि ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवे .
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.