समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प : थोरात

या अर्थसंकल्पात धोरणात्मक व वस्तुस्थितीवर आधारित रोजगार निर्मीतीसह उद्योग विश्‍वास दिलासा दिला आहे. भूमीपुत्रांना 80 टक्के नोकरी उपलब्ध करुन देण्याबरोबर तरुणांना शिकाऊ योजनेअंतर्गत सहा हजार कोटींचा निधी दिल्याने, तरुणांना मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.
balasaheb thorat praises state budget
balasaheb thorat praises state budget

संगमनेर (नगर):  महाविकास आघाडी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, तसेच राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ते म्हणाले, महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद, दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकर्‍यांसाठी योजना व नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50 हजार रूपयांचा लाभ देण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षात राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात योग्य त्या तरतूदी केल्या आहेत. राज्याचा विकासाचा रूतलेला गाडा पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी या अर्थसंकल्पातून चालना मिळेल.

दिलासादायक अर्थसंकल्प : सुधीर तांबे
मध्यमर्गीय व सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणाऱ्या, कर्जमाफीबरोबरच उद्योग व रोजगारवाढ करणार्‍या या अर्थसंकल्पामुळे राज्याच्या पायाभूत विकासासह महाराष्ट्र पुन्हा गतवैभवाकडे जाईल, असा विश्‍वास नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com