संगमनेर (नगर) : भाजपाने केलेल्या मेगाभरतीतील अनेकजण पुन्हा स्वगृही परतण्यास इच्छुक असून, त्यांना गर्वाचा फटका बसला आहे; असा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
थोरात म्हणाले, देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आली असून, उद्योगधंदे, कारखानदारी बंद पडल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे. राज्यातही बेरोजगारी रोखण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असून, शेतकऱ्यांना पाण्यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे, शेतीवरील भार कमी करीत सर्वसामान्यांचे जीवनमान समृध्द करणे, हे आपले ध्येय आहे. शेतकरी कर्जमाफीसह अनेक चांगले निर्णय राज्य सरकार घेत आहे.
काँग्रेसचा सीएए कायद्याला विरोध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातील जनतेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करणे गरजेचे असून, शेतकरी, कामगार, महिला, युवक, सर्वसामान्य नागरिक सुखी व संपन्न करणे काँग्रेस पक्षाचे ध्येय असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.