नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी उद्या मुंबईत निर्णय

नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी उद्या मुंबईत निर्णय

कऱ्हाड : जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी निर्णय घेण्यासाठी उद्या (सोमवारी) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तांबवे फाटा-साकुर्डी पेठ येथील बैठकीवेळी ते बोलत होते. 

मंत्री पाटील म्हणाले, भाजप सरकारने मागील पाच वर्षात सहकार क्षेत्र मोडीत काढुन खाजगी उद्योग धंदयांना सुट दिली. सहकारी तत्वावरील कारखानदारांना व शेतकऱ्यांना विजेच्या दराची सवलत दिली नाही. त्याचबरोबर अनेक जाचक नियम लावले. त्यामुळे सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न झाले. मात्र महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्याची भुमिका घेईल. महाविकास आघाडी सरकार जे शेतकरी पीक कर्जाची वेळेत परतफेड करतात त्यांच्यासाठी मदत करण्यासाठी विचार करत आहे. त्यासाठी उद्या उपमुख्यमंत्री पवार यांनी दुपारी चार वाजता मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. त्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल. कर्जाची परतफेड किंवा फिरवाफिरवी करून वेळेत कर्ज जे शेतकरी भरतात त्यांनाही हे सरकार मदत करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पश्‍चिम महाराष्ट्रात महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही कर्जमाफीचा फायदा होईल. सहकारामुळेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com