`अटक टाळण्यासाठी बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली होती '

........
  `अटक टाळण्यासाठी बाळासाहेबांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली होती '

मुंबई : आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली, अशा शब्दात भाजपचे नेते नीलेश राणे यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. " भाजपला वीर सावरकरांचा खोटा पुळका आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते, स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा " संघ' परिवार कोठे होता?, असा सवाल शिवसेनेने "सामना' या आपल्या मुखपत्रातून आपल्या संपादकीयमधून केला होता. 

सामना म्हणजे शिवसेनेने केलेल्या या टीकेला उत्तर म्हणून राणे यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे. बाळासाहेब होते का स्वातंत्र्य लढ्यात ? की त्यांच्या अगोदर ठाकरे कोण होते ? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत इंदिरा गांधींशी त्यांनी मांडवली केली. बाळासाहेबांचा तो इतिहास लोकं विसरलेले नाहीत,अशा आशयाचं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com