कधीकाळी सरकारला आदेश देणारे बागडे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र देतात तेव्हा...

नागपूर हिवाळी अधिवेशनात हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील फळबाग शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबाग शेतकरी आहेत. प्रामुख्याने ते डाळिंब, द्राक्ष, मोसंबी, जांब अशी पिके घेतात. या वर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि धुक्‍यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागे प्रमाणेच अन्य शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे.
कधीकाळी सरकारला आदेश देणारे बागडे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र देतात तेव्हा...

औरंगाबाद : भाजपच्या नेतृत्वाखाली फडणवीस सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून आदेश देणाऱ्या हरिभाऊ बागडे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक विनंती पत्र दिले. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बागडे यांनी पत्राद्वारे केली आहे.
 
राज्यात 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले होते. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. युती सरकारच्या पाच वर्षात बागडे यांनी सभागृह अत्यंत शिस्तीत चालवले. गोंधळी आमदारांना दराडवत तर कधी आपल्याच सरकारला आदेश देत बागडे यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपली छाप पाडली. 
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप महायुतीला जनादेश मिळाला, पण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी असलेली युती तोडली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यामुळे पुन्हा सत्तेत येऊन मोठ्या पदांवर बसण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले, त्यात माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा देखील समावेश आहे. 

उध्दव ठाकरेंना साकडे.. 
नागपूर हिवाळी अधिवेशनात हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील फळबाग शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबाग शेतकरी आहेत. प्रामुख्याने ते डाळिंब, द्राक्ष, मोसंबी, जांब अशी पिके घेतात. या वर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि धुक्‍यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागे प्रमाणेच अन्य शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे. 
परंतु त्यांना अद्याप शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत- नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी विनंती बागडे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com