बच्चू कडू कडाडले; कांदा दर पाडून सरकारकडून शेतक-यांचे `खून' 

सरकारने पन्नास हजार टन कांदा आयात केला. त्यामुळे भाव पडले. शेतक-यांना आत्महत्या कराव्या लागल्या. हे सरकारने केलेले खून आहेत, असा आरोप प्रहार शेतकरी संघटनेचे नेते आमदार बच्चु कडू यांनी केला.
बच्चू कडू कडाडले; कांदा दर पाडून सरकारकडून शेतक-यांचे `खून' 

नाशिक  : इथे मुबलक कांदा पिकतो. मात्र सरकारने पन्नास हजार टन कांदा आयात केला. त्यामुळे भाव पडले. शेतक-यांना आत्महत्या कराव्या लागल्या. हे सरकारने केलेले खून आहेत, असा आरोप प्रहार शेतकरी संघटनेचे नेते आमदार बच्चु कडू यांनी केला.

आमदार कडू यांच्या उपस्थितीत कांदा उत्पादक शेतक-यांचा मेळावा येवला बाजार समितीच्या सभागृहात झाला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कांदा जीवनावश्यक कसा? असा प्रश्न करून ते म्हणाले, की शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असतानाही कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतच होता. आज अचानक कांदा उत्पादकावर ही वाईट वेळ कशी आली? सरकारचे हे धोरण पाहिल्यावर संताप येतो. वाटते छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार काढावी अन् अफझलखानाऐवजी सरकारचा कोथळा बाहेर काढावा या शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश चव्हाण, गणेश निंबाळकर, हरिभाऊ महाजन, किरण करमळ आदी उपस्थित होते.

शेतक-यांसाठी तिजोरीत पैसा नाही म्हणता. मात्र मतांनी डोळा ठेवून सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता. आमदारांचे पगार वाढवता. तेव्हा त्यांना लाज वाटत नाही. भाजपावर रामभक्त नव्हे तर रावणभक्त आहेत. 
- आमदार बच्चू कडू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com