शेतकऱ्यांचा वाटा मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेल्यास आत्महत्या थांबतील : बच्चू कडू 

  शेतकऱ्यांचा वाटा मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेल्यास आत्महत्या थांबतील : बच्चू कडू 

जळगाव : शेतीला हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकऱ्यांच्या वाटा जर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्याच्या दालनात गेला तर शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल अन्‌ शेतकऱ्यांच्या आत्महत्याही थांबतील. असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले. 

निंभोरा बुद्रुक (ता.रावेर) येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

ते म्हणाले, "" देशाला बुलेट ट्रेनची गरज नाही तर शेतीला हमी भावाची खऱ्या अर्थाने गरज आहे. शेतकऱ्याच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याच्या घोषणेची खिल्ली उडविली. हे सरकार शेतकऱ्यांचे नसून व्यापाऱ्यांचे सरकार आहे. मूठभर गुजरातच्या व्यापाऱ्यांसाठी बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटींचे कर्ज घेतले जाते, परंतु शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. याचे सर्वात मोठे कारण ही जनता आहे. कारण तुम्ही हे सर्व मुकाट्याने सहन करीत आहे. तुमच्या शेतकऱ्याच्या वाटा ह्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेला तरच तुमच्या शेतमालाला योग्य भाव मिळणार आहे.'' 

देशातील सर्व झेंडे बाजूला सारून देशहितासाठी तिरंगा झेंड्याखाली सर्वानी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले. 

सुनील कोंडे यांनी प्रास्ताविक तर दिलशाद खान यांनी सूत्र संचालन केले. यावेळी डॉ. एस. डी. चौधरी, सह युवा रसिक मंडळाचे सर्व कार्यकर्ते, यावल, रावेर, चोपडा सह मध्यप्रदेशातील शेतकरी कडू यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com