नागपूर : राजकीय नेते, कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडणे आपल्या सर्वांसाठी दुर्दैवी आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची हत्या सुपारी कीलींगचा प्रकार आहे. अकोल्यात यापूर्वीही पाच वेळा अशा गावठी बंदुकींचा वापर झालेला आहे. त्यामुळे देशी कट्टा अकोल्यात आला कसा, येथून तपासाची सुरुवात होईल आणि चार-पाच दिवसांत आरोपी गजाआड होतील, असा विश्वास शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍन्ड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने आज येथील वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित विदर्भ विद्यार्थी संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात बच्चू कडू प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होते. उद्धाटन सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पोलिस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करुन सर्व दिशांना रवाना झाली आहेत. या पथकांमध्ये अमरावती परीक्षेत्रातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लवकरच पुंडकरांना मारणारा आणि त्याला सुपारी देणारा, दोघेही गजाआड असतील, असे ते म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.