पाच आमदार निवडून आणणार : बच्चू कडू 

आगामी निवडणूकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे पाच आमदार निवडून आणायचे हे आमचे ध्येय आहे. ज्यांना आमचे विचार पटतील त्यांच्याशी आम्ही जरुर युती करु. याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पाच आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी भूमिका घेऊ, असे सांगत आमदार बच्चू कडू यांनी राजकीय पक्षांशी युती करण्याचे संकेत आज फलटण येथे दिले.
पाच आमदार निवडून आणणार : बच्चू कडू 

फलटण शहर : आगामी निवडणूकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे पाच आमदार निवडून आणायचे हे आमचे ध्येय आहे. ज्यांना आमचे विचार पटतील त्यांच्याशी आम्ही जरुर युती करु. याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पाच आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी भूमिका घेऊ, असे सांगत आमदार बच्चू कडू यांनी राजकीय पक्षांशी युती करण्याचे संकेत आज फलटण येथे दिले. 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संवाद यात्रेनिमित्त आमदार बच्चू कडू फलटण येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत प्रहारचे सातारा-सोलापूरचे संपर्क प्रमुख शंभुराज खलाटे व पदाधिकारी उपस्थित होते. 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बोलताना आमदार कडू म्हणाले, आगामी निवडणूकांत आमच्या पक्षाचे पाच आमदार निवडून आणायचे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे ज्यांना आमचे विचार पटतील त्यांच्याशी आम्ही जरुर युती करु. याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पाच आमदार निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी भूमिका घेऊ असे सांगत त्यांनी राजकीय पक्षांशी युती करण्याचे संकेत दिले. 

लोकसभेतील वैशाली येडे यांची उमेदवारी देशभरात व देशाबाहेरही चर्चेची ठरली. एखादा आमदार मरण पावला तर त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली जाते व सहानुभूती मिळुन ती निवडूनही येते. त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला तशी सहानुभूती मिळते का, हे तपासण्यासाठीच ती उमेदवारी दिली होती. लोकांसाठी ती एक प्रकारे परिक्षाच होती. परंतु ते यामध्ये फेल झाले. राजकारण हे राजकारणाच्याच पध्दतीने करायला हवे आहे, अशी व्यवस्था देशभरात निर्माण झाली आहे. त्यामुळेच लोकशाहीत वेगळी कलाटणी मारुन आमची बाजु भक्कम करण्याकरीता आम्ही युतीचा विचार करीत आहोत, असेही आमदार कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. 

दिल्लीत `आर या पार'चे आंदोलन 
मोदी सरकारचा 16 लाख कोटींचा अर्थ संकल्प आहे. परंतु हे केंद्र सरकार 80 ते 100 टक्के अपंग असणारांना केवळ दोनशे रुपये देत आहे. 40 ते 80 टक्के अपंगत्व असणाऱ्यांना मोदी सरकार एकही रुपया देत नाही. त्यामुळे मुकबधीरांसाठी वेगळा अभ्यासक्रम, प्रत्येक राज्यात विद्यापीठ व्हावे व शिक्षणाबाबत संशोधन व्हावे. यासाठी संशोधन मंडळ असावित व अण्य मागण्यांसाठी दिल्ली येथे येत्या नऊ ऑगस्टला अब की बार आर पार.. अशा प्रकारचे आंदोलन `प्रहार'च्यावतीने करण्यात येणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com