आमदार बच्चू कडूंच्या धावपळीने शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला न्याय! 

आयटीआय वीजतंत्री प्रशिक्षणार्थींना चांदवड महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून परीक्षेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने गुण देण्यात न आल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेला मुकणार होते. त्यांचे शैक्षीँक वर्ष वाया जाण्याची भीती होती. त्याची दखल घेत 'प्रहार'चे आमदार बच्चू कडू यांनी तातडीने हालचाली करीत दिल्लीमध्ये सूत्रे हलवून या प्रशिक्षनार्थीना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आमदार बच्चू कडूंच्या धावपळीने शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला न्याय! 

चांदवड : आयटीआय वीजतंत्री प्रशिक्षणार्थींना चांदवड महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून परीक्षेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने गुण देण्यात न आल्याने जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेला मुकणार होते. त्यांचे शैक्षीँक वर्ष वाया जाण्याची भीती होती. त्याची दखल घेत 'प्रहार'चे आमदार बच्चू कडू यांनी तातडीने हालचाली करीत दिल्लीमध्ये सूत्रे हलवून या प्रशिक्षनार्थीना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

आयटीआय मधील प्रशिक्षणार्थींची आज तारीख 29 रोजी नाशिक येथे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेपूर्वी चांदवड उपविभागातील विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध न झाल्याने या परीक्षेला बसता येणार नव्हते याप्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चांदवड कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आमदार डॉक्‍टर राहुल आहेर यांचे स्वीय सहाय्यक सागर आहिरे व उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांचे स्वीय सहाय्यक नितीन फॅंगाळ यांच्या मध्यस्थीने दिनांक च्या रात्री दहा वाजेपर्यंत येथील अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. मात्र, उशिरापर्यंत यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याने अखेर आमदार डॉक्‍टर राहुल आहेर यांनी देखील भ्रमणध्वनीवरून कार्यकारी अभियंता मधुसूदन वाडे यांच्याशी संपर्क साधला होता. 

यानंतर या सर्व ते विद्यार्थ्यांना या कार्यालयाकडून आपले ऑनलाईन गुण वेळीच भरण्यात आले असल्याचे लेखी कळविण्यात आल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळपासून ठाण मांडून असलेले कार्यालय सोडले व दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता सातपूर आयटीआय येथे जमा झाले. तोपर्यंत दैनिक सकाळ द्वारे या सर्व विद्यार्थ्यांना आज होणाऱ्या परीक्षेला मुकणार असल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले होते याची दखल घेत प्रहार शेतकरी नेते प्रकाश चव्हाण यांनी सातपूर आयटीआय येथे जात या सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेत त्या आमदार बच्चू कडू यांच्या पर्यंत पोहचवल्या. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची आमदार बच्चू कडू यांनी दखल घेत दैनिक सकाळने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा हवाला देत आयटीआयच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयातून सूत्र हलविताच टिटीसी चे उपसंचालक के. सिंग यांनी सातपूर आयटीआय प्राचार्यांना या विद्यार्थ्यांच्या नवीन वेळापत्रक बाबत मेल केला यानुसार या सर्व विद्यार्थ्यांची येत्या जूनमध्ये परीक्षा होणार असून आज झालेल्या व जूनमध्ये होणाऱ्या परीक्षांचा निकालही एकत्रित लागणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींचे वर्ष वाया जाता जाता वाचले आहे. 

जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी परीक्षेला मुकणार असल्याची बातमी 'सकाळ' मध्ये वाचली. यानंतर आमदार कडूंशी संपर्क केला. आमदार बचू कडू यांनी दिल्लीमधील कार्यालयाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नवीन वेळापत्रक मिळवून दिले. त्यांचे शैक्षणीक वर्षे व होणारे नुकसान वाचले.- प्रकाश चव्हाण, शेतकरी नेते, प्रहार, नाशिक. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com