काल सावरकरांवरून फेल झाले म्हणून आज शेतकऱ्यांवरून गोंधळ घातला : बच्चू कडू

 काल सावरकरांवरून फेल झाले म्हणून आज शेतकऱ्यांवरून गोंधळ घातला : बच्चू कडू

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून काल गोंधळ घातला, पण त्यात विरोधक "फेल' झाले. त्यामुळे त्यांनी आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला, असे अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले. शेतकऱ्यांप्रती विरोधकांना जर एवढाच कळवळा आहे, तर यांनी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी केंद्र सरकारला एक पत्र तरी दिले का ? असा प्रश्न आमदार कडू यांनी विरोधकांना केला. 

तुमचेही खासदार महाराष्ट्रातून निवडून दिल्लीला गेले आहेत. मग महाराष्ट्राप्रती तुमची काहीच जबाबदारी नाही का ? असाही प्रश्न कडू यांनी केला. बच्चू कडू शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी आज सभागृहात धक्काबुक्की केली. याबाबत त्यांना विचारले असता, शेतकऱ्यांच्या विषयांवर आक्रमक असलेच पाहिजे, आक्रमक असणे वाईट नाही. पण सभागृहात धक्काबुक्की आणि हाणामारी व्हायला नको होती. सभागृहाची परंपरा आणि मानसन्मान प्रत्येकाने राखायलाच हवा. मोदी आणि शहा हे सध्या देशाचे शहेनशहा आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला हवे. महाराष्ट्राचे सरकार स्थापन होऊन जेमतेम पंधरा दिवस झाले आहेत. पंधरा दिवसांत शेतात कोणती भाजी लावायची ? याचा देखील निर्णय होत नाही, तर संपूर्ण राज्यासाठीचे निर्णय पंधरा दिवसात कसे होतील ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com