मराठवाडा पदवीधरमध्ये मतांचा टक्का वाढला, चारपर्यंत ५३ टक्के मतदान

सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारी नुसार मराठवाड्यात २०.७३ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.तर दुपारी १२ ते २ या दोन तासांतच १७ टक्यांनी मतदानात वाढ होऊन ते ३७ टक्क्यांवर पोहचले होते. दुपारी मतदारांमध्ये उत्साह वाढलेला दिसला. दुपारी दोन ते चार या दोन तासांत पुन्हा २० टक्यांनी मतदानात वाढ झाली.
Marahtwada padvidhar matadar sangh news aurangabad
Marahtwada padvidhar matadar sangh news aurangabad

औरंगाबाद ः अपेक्षे प्रमाणे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मतदानाचा टक्का गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढला आहे. दुपारी चारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनूसार ५३.३० टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. शेवटच्या एका तासात आणखी दहा टक्के मतदान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज आठही जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. ४ पर्यंत सर्वाधिक मतदानाची नाेंद परभणीमध्ये ५८.६३ टक्के एवढी झाली होती.

राज्यासह मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदानाला सुरूवात झाली. महाविकास आघाडी विरुध्द भाजप अशी थेट लढत असलेल्या या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक या दोघांची देखील प्रतिष्ठापणा लागली आहे. गेली पंधरा दिवस मराठवाड्यात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. ३५ उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावत असले तरी महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण आणि भाजप महायुतीचे शिरीष बोराळकर यांच्यात काटे की टक्कर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळी काहीसे धिम्यागतीने सुरू झालेल्या मतदानात दहानंतर मात्र वेग आल्याचे पहायला मिळाले. दुपारी यात आणखी गती आली. सतीश चव्हाण, शिरीष बोराळकर या उमदेवारांनी सकाळीच मतदान करत शहरातील विविध केंद्रांना भेटी देत आढावा धेतला. या शिवाय औरंगाबासह मराठवाड्यातील महाविकास आघाडी व भाजपच्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी देखील मतदानाचा हक्क बजावत मतदारांना बाहेर पडण्याचे आवाहन केले.

सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारी नुसार मराठवाड्यात २०.७३ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. तर दुपारी  १२ ते २ या दोन तासांतच १७ टक्यांनी मतदानात वाढ होऊन ते ३७ टक्क्यांवर पोहचले होते. दुपारी मतदारांमध्ये उत्साह वाढलेला दिसला. दुपारी दोन ते चार या दोन तासांत पुन्हा २० टक्यांनी मतदानात वाढ झाली.

३ लाख ७३ हजार १६६ पैकी १ लाख ९८ हजार ८९६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये पुरुष मतदारांचे प्रमाण ५६.२८ तर महिलांचे ४२.०९ टक्के इतके नाेंदवले गेले. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची तर लातूरमध्ये सर्वात कमी ४५.७० टक्के एवढे मतदान झाले .

बारापर्यंत जिल्हानिहाय झालेले मतदान..

औरंगाबाद - ५२.९८ टक्के

जालना - ५५.७९ टक्के

परभणी - ५८.६३ टक्के

हिंगोली - ५२.९३. टक्के

नांदेड - ५५.३० टक्के

लातूर - ४५.७० टक्के

उस्मानाबाद- ५४.९६ टक्के

बीड- ५२.५० टक्के

एकूण -  ५३.३० टक्के

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com