भाजप महिला मोर्चा ‘समृद्धी सुकन्या योजना‘ ची सत्तर हजार खाती उघडणार.

१८ ते २१ व्या वर्षीच खात्यातून त्या मुलीलाच पैसे काढता येणार आहेत. लोकसहभागातून या योजने अंतर्गत अनेक संस्था किंवा व्यक्तींना अशा गोर-गरीब, अनाथ, दिव्यांग मुलीचे पालकत्व घेता येणार आहे. ही योजना देशातील अशा लाखो मुलींचे भवितव्य सुरक्षित करणारी असल्यामुळे जास्तीत जास्त खाती उघडण्याचा आमचा मानस आहे.
vijay rahatkar news
vijay rahatkar news

औरंगाबाद ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त भाजप राष्‍ट्रीय महिला मोर्च्याच्या वतीने देशभरातील गोर-गरीब, दिव्यांग, अनाथ, गरजू मुलींच्या नावे ‘समृद्धी सुकन्या योजना‘ अंतर्गत सत्तर हजार खाती उघडण्यात येणार आहेत. सेवा सप्ताहाच्या निमित्ताने औरंगाबादेत या मोहिमेचा शुभारंभ महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या हस्ते होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिवसा निमित्त भाजपच्या वतीने देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहे. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाने देखील समृध्दी सुकन्या योजनेची सत्तर हजार खाती उघडण्याचा निर्धार केला आहे.

या संदर्भात ‘सरकारनामा‘शी बोलतांना विजया रहाटकर म्हणाल्या, देशातील गरजू, दिव्यांग, अनाथ मुलींच्या शिक्षण, विवाह व अन्य गरजांसाठी केंद्र सरकारच्या वतीने समृध्दी सुकन्या योजना हा राष्ट्रीय उपक्रम म्हणून हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा लाभ समाजातील गरीब घटकापर्यंत पोहचावा यासाठी जास्तीत जास्त खाती उघडण्यावर आम्ही भर देणार आहोत.

मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राबवले जात असतांना महिला मोर्चाने समृद्धी सुकन्या योजनेची देशभरात सत्तर हजार खाती उघडण्याचा निश्चय केला आहे. या मोहिमेची सुरूवात आम्ही आज औरंगाबादेतून करतो आहोत. अगदी दहा वर्षाच्या मुलीचे या योजने अंतर्गत खाते उघडून तिचे भविष्य सुरक्षित करण्याचा हा प्रयत्न आहे. शंभर रुपयांपासून ते दीड लाखापर्यंतची रक्कम दरमहा या खात्यात जमा करता येऊ शकेल, अशी तरतूद आहे. ही योजना सरकारची असली तरी यामध्ये लोकसहभाग वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

समाजात अनेक संस्था, दानशूर व्यक्ती आहेत, ज्या सढळ हस्ते मदतीसाठी सदैव तत्पर असतात. फक्त त्यांना त्यांची मदत योग्य आणि गरजू व्यक्ती पर्यंत पोहचते की नाही याची खात्री होणे गरजेचे असते. या योजने अतंर्गत मदत करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्तींनी टॅक्समध्ये सूट देण्यची तरतूद देखील योजनेत करण्यात आली आहे. शिवाय त्यांनी केलेली मदत ही गरजू, अनाथ, दिव्यांग मुलींना केवळ शैक्षणिक व विवाह या कारणासाठीच खात्यातून काढता येणार आहे. 

१८ ते २१ व्या वर्षीच खात्यातून त्या मुलीलाच पैसे काढता येणार आहेत. लोकसहभागातून या योजने अंतर्गत अनेक संस्था किंवा व्यक्तींना अशा गोर-गरीब, अनाथ, दिव्यांग मुलीचे पालकत्व घेता येणार आहे. ही योजना देशातील अशा लाखो मुलींचे भवितव्य सुरक्षित करणारी असल्यामुळे जास्तीत जास्त खाती उघडण्याचा आमचा मानस आहे. बॅंकेत जाऊन खाते उघडणे मुलींना शक्य होत नाही, त्यामुळे भाजप महिला मोर्च्याच्या माध्यमातून देशभरात सत्तर हजार खाती उघडण्याचा संकल्प हाती घेण्यात आला असल्याचेही रहाटकर यांनी सांगितले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com