औरंगाबाद : ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याच्या आरोपावर राज्यातलं राजकारण चांगलच ढवळून निघाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत पीएफआयच्या साठपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना अटक केले. एकीकडे यावर राजकारण पेटलेलं असतानाच एनआयएने सोमवारी (26 सप्टे) मध्यरात्री महाराष्ट्र आणि देशभरात विविध ठिकाणी पुन्हा छापेमारी केली आहे.
एनआयएने सोमवारी मध्यरात्री महाराष्ट्रासह ८ राज्यात जवळरपास २५ ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. यामध्ये औरंगाबादमधील १४ ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात आली. १३ ते १४ पीएफआय कार्यकर्त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. तर सोलापुरातूनही एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. एनआयएची ही कारवाई रात्रभर सुरू होती. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंबंधी वृत्त दिले आहे.
रात्रीच्या या कारवाईत एकूण २४ ठिकाणी शोधमोहीम घेतली गेली. यापूर्वीच्या कारवाईतही औरंगाबादधून ४ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्या सर्व संशयित आरोपींची चौकशी होत आहे. सर्व आरोपींना आता दिल्लात नेण्यात आले, अशी माहिती मिळत आहे.
ईडी आणि एनआयएकडून देशभरातून आजपर्यंत १०६ पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रासोबतच केरळ, मणीपूर आणि राजस्थान या राज्यांमध्येही पीएफआय कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.