पुरग्रस्तांसाठी औरंगाबादेतील धार्मिक संस्थांनी उभा केला 25 लाखांचा निधी 

कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पुरग्रस्तांनाच्या मदतीसाठी औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील विविध धार्मिक संस्थानी पुढाकार घेतला आहे. या संस्थानी 25 लाखांचा निधी जमा केला आहे. हा निधी राज्यमंत्री अतुल सावे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला जाणार आहेत. हा मदत निधीचा धनादेश विविध धार्मिक संस्थाच्या वतीने राज्यमंत्री सावेंकडे सुर्पूत करण्यात आला.
पुरग्रस्तांसाठी औरंगाबादेतील धार्मिक संस्थांनी उभा केला 25 लाखांचा निधी 

औरंगाबाद : कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पुरग्रस्तांनाच्या मदतीसाठी औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील विविध धार्मिक संस्थानी पुढाकार घेतला आहे. या संस्थानी 25 लाखांचा निधी जमा केला आहे. हा निधी राज्यमंत्री अतुल सावे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला जाणार आहेत. हा मदत निधीचा धनादेश विविध धार्मिक संस्थाच्या वतीने राज्यमंत्री सावेंकडे सुर्पूत करण्यात आल. 

पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या भयवाह पुरपरिस्थतीमूळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या भागातील लोंकाच्या पुर्नरवसनासाठी राज्यभरातून मदत येत आहे. राज्य सरकारतर्फेही मदत केली जात आहेत. असे असताना देशभरातील मोठे देवस्थांनातर्फेही मदत जाहिर करण्यात आली.यामूळे औरंगाबाद जिल्ह्यातील धार्मिक संस्थांनीही मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन राज्यमंत्री अतुल सावे यांनी केले होते, त्यानुसार संस्थांनी पुढे येत ही मदत जमा केली आहे. यात किराडपुरा येथील राम मंदीरात सर्व धार्मिक संस्थांनी एकत्र येत त्यांच्याकडील मदत एकत्र जमा केली. 

किरडापुरा येथील राम मंदिरातर्फे एक लाख 21 हजार रूपये,वेरुळ येथील घुष्णेश्‍वर महादेव मंदिर समितीने पाच लाख रुपये दिले,खुलताबाद येथील भद्रा मारोती मंदिर समितीतर्फे पाच लाख रुपये, भक्‍ती गणेश मंदिर एन-1 सिडकोतर्फे पाच लाख रुपये, वरद गणेश मंदिर, समर्थनगर यांच्यातर्फे एक लाख 51 हजार रूपये, लासूर स्टेशन येथील देवी दाक्षायणी मंदिर समितीतर्फे एक लाख 51 हजार रूपये, संत एकनाथ मंदिर, औरंगपुरातर्फे 1 लाख रूपये, रेणुकामाता मंदिर सिडको एन-9तर्फे 21 हजार रूपये, मांगीर बाबा मंदिर समिती शेंद्रातर्फे 1 लाख 11 हजार रूपये, गजानन महारा मंदिर ,गारखेडा परिसर व पैठण येथील संत एकनाथ मंदिर संस्थातर्फेही निधी देण्यात आला. 

अतुल सावे म्हणाले, राज्यात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीवर राज्य सरकार आपल्या परिणे मदतीचे काम करत आहे. परंतु आपण देखील समाजाचे काही देणे लागतोय या भावनेने आणि राज्य सरकार वर विश्वास दाखवून आपण केलेली ही मदत पुरग्रस्तांच्या पुर्नरवसनासाठी मदतगार ठरेल. ही मदत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोचवेल. तसेच मुख्यमंत्री 26 ऑगस्टला शहरात आल्यानंतर तुमची बैठक घेऊ असेही सावे यांनी सांगितले. 

यावेळी राम मंदिर समीतीचे अध्यक्ष मानसिंग पवार, भद्रा मरूती मंदिर समीतीचे बारगळ अप्पा पाटील, भक्ती गणेश मंदिर समीतीचे एस.एम.कुलकर्णी, नाथ मंदिराचे ऍड घुगे,वरद गणेश मंदिर समीतीचे खोचे,दिपक अग्निहोत्री, दयाराम बसैय्ये बंधू, मनसुटे काका,राजु कुलकर्णी यांच्या सह आनेक भक्त मंडळाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com