औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 208 पैकी 75 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यानंतर आता सर्व मतदारसंघात मिळून 133 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. सर्वाधिक 34 उमेदवार राज्यमंत्री अतुल सावे यांच्या तर सर्वात कमी म्हणजे 7 सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.
शिवसेना-भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील बहुतांश बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. औरंगाबाद पश्चिम, कन्नड वगळता सात मतदारसंघातील बंडखोरांना थंड करण्यात युती-आघाडीच्या नेत्यांना यश आले आहे. त्यामुळे कुठल्या मतदारसंघात कुणाची लढत कुणाशी होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शहरातील पूर्वमध्ये भाजपचे सावे-एमआयएमचे कादरी, पश्चिम- शिवसेना शिरसाट, एमआयएम-बोर्डे- अपक्ष-शिंदे, मध्य- शिवसेना जैस्वाल- राष्ट्रवादी कदीर मौलाना, वंचित आघाडी-भुईगळ अशी लढत रंगणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीणच्या गंगापूरमध्ये भाजपचे बंब- राष्ट्रवादीचे माने, वैजापूर- शिवसेना- बोरनारे-राष्ट्रवादी-चिकटगांवकर, कन्नड- शिवसेना- राजपूत, शिवस्वराज्य-जाधव, भाजप बंडखोर अपक्ष-पवार, सिल्लोड-शिवसेना-सत्तार, अपक्ष-पालोदकर, पैठण- शिवसेना- भुमरे, राष्ट्रवादी-गोर्डे, वंचित आघाडी-चव्हाण, तर फुलंब्रीमध्ये भाजपचे -बागडे विरुध्द कॉंग्रेसचे काळे अशी लढत होणार आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात एकूण 208 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आज शेवटच्या दिवशी यापैकी 75 जणांनी माघार घेतली.
मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या
1. सिल्लोड-सोयगांव- 07
2. कन्नड-सोयगांव -08
3. फुलंब्री -13
4. औरंगाबाद मध्य- 14
5. औरंगाबाद पश्चिम-12
6. औरंगाबा पुर्व- 34
7. पैठण- 15
8. गंगापूर- 14
9. वैजापूर- 16
एकूण 133
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.