दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना-भाजपची इगतपुरीला बैठक 

दोन दिवसावर आलेल्या या निवडणुकीत मते फुटू नयेत याची पुर्णता शिवसेनेकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. याच संदर्भात दोन्ही पक्षातर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई, औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. विजयाचा आकडा पार करणारी संख्या असतानाही महायुतीच्या उमेदवारांना दगाफटका होण्याची शक्‍यता वाढत आहेत. या मुळेच ही बैठक घेण्यात आल्याचीही चर्चा होत आहे.
दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना-भाजपची इगतपुरीला बैठक 

औरंगाबाद: औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी विजयासाठी शिवसेनेतर्फे तगडी फिल्डींग लावण्यात आली आहे. याच निवडणुकीत काही दगाफटका होऊ नयेत यासाठी दोन्ही जिल्ह्यातील महायुतीच्या लोकप्रतिनिधी मतदारांना इगतपुरीला सहलीवर नेण्यात आले आहे.

दोन दिवसावर आलेल्या या निवडणुकीत मते फुटू नयेत याची पुर्णता शिवसेनेकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. याच संदर्भात दोन्ही पक्षातर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई, औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. विजयाचा आकडा पार करणारी संख्या असतानाही महायुतीच्या उमेदवारांना दगाफटका होण्याची शक्‍यता वाढत आहेत. या मुळेच ही बैठक घेण्यात आल्याचीही चर्चा होत आहे. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्थेची 19 ऑगस्टला निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीपुर्वी भाजपच्या जिल्हा परिषदेतील सदस्यांची शिवसेनेवर जिल्हा परिषदेतील आघाडीमुळे नाराजी होती. चिकलठाणा येथे झालेल्या बुथ प्रमुख्याच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी ती नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. त्यानंतर भाजप आणि शिवसेनच्या जिल्हा परिषद सदस्यांचीही एका हॉटेलात बैठक घेऊन मन वळविण्यात आले होते. एवढे नव्हे तर शिवसेनेने भाजपच्या राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या माध्यमातून बैठक घेऊन महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. 

15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी दोन ते तीन ट्रॅव्हल्स भरून महायुतीच्या मतदारांना इगतपुरचीच्या सहलीवर नेण्यात आले. तेथील एका हॉटेल आणि बोध व्हॅली येथे थांबविण्यात आले आहे. तेथे सर्वांची शाही सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. दरम्यान येथेही भाजप-शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांत काही वाद होऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहेत. 

इगतपुरी येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सर्वाजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेश प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, भगवान घडमोडे, महापौर नंदकुमार घोडेले, विनोद घोसाळकर, महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत भाजप शिवसेनेच्या मतदारांची बैठक घेण्यात आली. बैठकीत ही निवडणुक युतीच्या उमेदवारांना सोफी असली तरीही, गाफिल राहू नका, निवडणुकीतील एक -एक मत महत्वाचे आहे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच मतदान कसे करायचे, यांची चाचणी मतदारांकडून घेण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेतील शिवसेना-कॉंग्रेसच्या आघाडीमुळेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या आदेशानुसार या निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या सुचना या बैठकी देण्यात आल्याचे शिरिष बोराळकर यांनी सांगितले. ही निवडणुक सहज व सोपी होणार आहे. यापुर्वी अशी निवडणूक झाली नव्हती असेही बोराळकर म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com