आठ दिवसापूर्वीच म्हणाले होते " काळजी करु नका, सरकार आपलंच येणार ' - अतुल सावे

 आठ दिवसापूर्वीच म्हणाले होते " काळजी करु नका, सरकार आपलंच येणार ' - अतुल सावे

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांना आठ दिवसापूर्वीच भेटलो होतो, तेव्हा ते काळजी करु नका असे म्हटले होते, असा मोठा खुलासा औरंगाबादमधील भाजपचे आमदार अतुल सावे यांनी केला आहे. " तुम्ही विश्‍वास ठेवा, काळजी करु नका, सरकार आपलंच येणार आहे, आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे' असेही मुख्यमंत्री आठ दिवसापूर्वीच त्यांना भेटायला गेल्यानंतर म्हटले होते असे श्री. सावे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वक्‍तव्य केले आहे. राजकीय वर्तुळात भुकंप झाला म्हणजे नेमकं काय झालं यावर बोलताना आमदार सावे यांनी विविध खुलासे केले आहेत. 


आमदार सावे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेची कामे मागील पाच वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. संपूर्ण राज्याची प्रगती, विकास झाल्यानेच जनतेने मुख्यमंत्र्यांच्या बाजूने कौला दिला होता, पून्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा होती, त्याचाच कौल म्हणून फडवणीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, असेही आमदार सावे म्हणाले. 

उद्या सकाळी म्हणजेच शनिवारी (ता.23) सकाळी सकाळी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती तुम्हाला होती का ? या पत्रकारांच्या प्रश्‍नावर आमदार सावे म्हणाले की, आम्ही भाजपचे काहीजण साधारण आठ दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो, त्याचवेळी श्री. फडणवीस यांनी सांगितले होते की, "तुम्ही विश्‍वास ठेवा, काळजी करु नका, सरकार आपलंच येणार आहे, आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे' आज मुख्यमंत्र्यांनी जे बोलतात ते करतातच हे दाखविले आहे. त्यांनी महाराष्ट्राचा विकास करण्याची जी शपथ घेतली आहे, ती नक्कीच त्यांच्याकडून महाराष्ट्राला ते एक दिवस शिखरावर नेऊन पोहोचविणार आहेत. 

पत्रकारांच्या "तुम्ही उद्योगमंत्री होतात, शिवसेना तुमच्यासोबत होती, आता शिवसेना सोडून राष्ट्रवादी सोबत आहे' या प्रश्‍नावर श्री. सावे म्हणाले की, "आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत, आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्‍वास आहे. ते राज्याच्या विकासासाठी जे बरोबर असतील त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करतील. मला खात्री आहे, महाराष्ट्रात मागील पाच वर्षात जसा विकास झाला तसाच विकास करुन मुख्यमंत्री महाराष्ट्राला येत्या पाच वर्षात प्रगतीच्या शिखराला पोहोचवतील. मुख्यमंत्री फडवणीस यांना खुप शुभेच्छा असेही अतुल सावे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com